सामाजिक

आपल्या पुर्वाजांचे बलीदान  यांचे स्मृती आठवण्यासाठी गडकिल्ले पहावेत – विनायक खोत

विवेकानंद प्रतिष्ठान
 गणेशोत्सव व्याख्यानमाला – १
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
गड किल्ले स्वराज्याचे इतिहासाचे पराक्रमाचे शौर्याचे प्रतीक आहेत . गडकिल्ले निगा संवर्धन गरज आहे . गड किल्ले कसे पहावेत का पहावेत कसे पहावेत गड किल्ले यांचे प्रकार आपल्या पुर्वाजांचे बलीदान  यांचे स्मृती आठवण्यासाठी गडकिल्ले पहावेत . छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे पहिले क्रांतीकारी पुरुष आहेत . आपला हा इतिहास शौर्य मंदिरे सर्वांना सांगण्यास आपण कमी पडत आहोत . आपण हा इतिहास विसरत चाललो आहोत जे इतिहास विसरतात ते भविषय विसरतात भविष्य घडविण्यासाठी इतिहास माहित असणे तो साऱ्याना सांगणं गरजेच आहे. हा इतिहास सर्वांनां सांगण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी प्रतिष्ठान माध्यमातुन गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजित करून करीत आहेत हे गौरवाची बाब असल्याचे  असे प्रतिपादन शिवाजी ट्रेल ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था अध्यक्ष विनायक खोत यांनी केले . विवेकानंद प्रतिष्ठान संस्थापक यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या प्रारंभी  गुरुवारी पहिले पुष्प गुंफताना  व्याख्याते विनायक खोत  बोलत होते .
    प्रारंभी गणेशोत्सव व्याख्यानमालेचा प्रारंभ  दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन सुनिल गोरे, मोहन शिंदे,  दामोदर शिंगे,गुरुपादप्पा आळगी,राजशेखर उबराणीकर, दत्तात्रय कटारे आदि   मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले .
व्याख्याते विनायक खोत यांचा परिचय कल्पना स्वामी यांनी करून दिला व्याख्याते दुर्ग किल्ले जत न संवर्धक. स्वच्छता चळवळीचे विनायक खोत यांचा सत्कार समर्थाची प्रतिमा, शाल वृक्ष देऊन प्रतिष्ठानचे संचालक अशोक येणगुरे व मुकुंद उत्पात,आकाश पटांगळे आदि मान्यवरांचा प्रतिष्ठान वतीन सत्कार करण्यात आला .
   याप्रसंगी  मल्लीकार्जुन  मसुती  महाविर येणगुरे महेश कापसे  विलास कोरे मनोहर चव्हाण प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी खंडेराव घाडगे सुत्र संचालक बापुजी निंबाळकर महेश वागदरे पप्पू मोरे शिवलिंगप्पा वाले अभिजित लोके नागेश कलशेट्टी चंद्रकांत दसले अशोक दंतकाळे निळकंठ कापसे विकास तळवार सिद्राम पाटील पत्रकार प्रशांत भगरे योगेश कबाडे , अरविंद पाटील , मारुती बावडे , रमेश भंडारी ,नंदकुमार जगदाळे , राजेश जगताप ,श्रीकांत झिपरे प्रतिष्ठानचे सदस्य श्रोते मोठ्या संख्याने उपस्थित होते .
चौकट. –
    महाराष्ट्रातील गड व किल्ले या विषयावर पहिले पुष्प गुंफताना रसिक श्रोत्यांनां एलईडी प्रेझेन्टेशनद्वारे व्याख्याते विनायक खोत यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची अक्षरक्षः भ्रमंतीच केली . रसिक श्रोते एक एक गड किल्ले एलईडी प्रेझेन्टेशनद्वारा पाहता असता गड किल्ल्याची इंतभुंत माहितीसह शिवरायांचा स्वराज्याच्या निर्मितीसाठी एक एक गड किल्ला स्वराज्याच्या निर्मातीत किती महत्वाचा आहे हे विशद केले . स्वराज्य प्राप्ती साठी दिलेला लढा शौर्य इतिहास प्रत्येक गड किल्ल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्व  श्रोत्यासमोर उभा केला .
चौकट –
 विवेकानंद प्रतिष्ठान गेली १३ वर्षापासून अक्कलकोटकरांसाठी विविध विषयावर नामवंत तज्ञ इतिहास अभ्यासक यांचे व्याख्यानाची मेजवानी देत आहे . व्याख्यानमालेचे हे १४ वे वर्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button