टॉप न्यूज

अक्कलकोटात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची अलोट गर्दी !

 

दर्शन मंडप अभावी पोलीस प्रशासनावर पडतोय ताण !
 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे .हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट नगरीत परगावच्या भाविकांची मांदियाळी वाढली असून दर्शन मंडप अभावी पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे. 
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांचा प्रचंड गर्दी वाढली आहे. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर हा भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला आहे .परगावच्या भाविकांची दर्शन रांग ही  श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते फत्तेसिंह चौकाच्या पुढे गेली आहे .शुक्रवारपासून परगावच्या भाविकांची प्रचंड गर्दी अक्कलकोट नगरीत होत आहे. शनिवारी दिवसभर हजारो भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. अक्कलकोट उत्तर पोलीस प्रशासनाकडून दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसरात रांगेत भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस प्रशासनाकडून दर्शन रांगेचे टप्पे करण्यात आले आहेत. सुसज्ज दर्शन मंडप नसल्याने परगावच्या भाविकांची मोठी अडचण होत असून उन्हामध्ये अबाल वृद्धांना थांबण्याची वेळ आली आहे. दर्शन मंडप अभावी पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडत असून  गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनास कसरत करावी लागत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासह देशाच्या इतर राज्यातून स्वामीभक्त हे दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत येत आहेत . लाखो भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर गजबजुन गेला आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर समितीकडून परगावच्या स्वामी भक्तांना दर्शन सुलभपणे मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त मंडळी, कर्मचारी हे भाविकांना दर्शन सुलभ पणे मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे पारगावच्या भाविकांनी महाप्रसादासाठी प्रचंड गर्दी केली आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परगावच्या स्वामी भक्तांना दोन वेळा महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळाच्या भक्तनिवास यात्री निवासात परगावच्या भाविकांना निवासासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सदरचा परिसर हा भाविक भक्तांनी गजबजून गेला आहे. श्री स्वामी समर्थ समाधी मठ ,श्री गुरु मंदिर , श्री राजेराय मठ  व इतर ठिकाणी भाविक हे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर परगावच्या भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहरातील खाजगी घरे , लॉज यामध्ये निवासाची व्यवस्था केली जात आहे. परगावच्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचा फायदा घेत त्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे. परगावच्या भाविकांच्या चार चाकी वाहनांची पार्किंग सोयही मैंदर्गी रोड , कमला राजे चौक , हत्ती तलाव परिसर , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पार्किंग ठिकाण , श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आली आहे. परगावच्या भाविका च्यां  सर्वत्र चार चाकी वाहनांच्या रांगा लागल्याने गर्दी होत आहे. सदरची गर्दी ही दोन तीन जानेवारीपर्यंत असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परगावच्या भाविकांची संख्या ही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून लाखो भाविक हे दर्शन घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button