सामाजिक

केरु रामचंद्र जाधव यांचे निधन

 सोलापूर ( प्रतिनिधी ) – अतिशय हालाखीच्या परिस्थितीत हमाली करून,रस्त्या अर डांबर टाकने,गवंडी काम करून आपले शिक्षण पूर्ण केले.एका झोपडीचे रूपांतर एका घरात केले. नोकरीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून अस्तास गेलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली समता सैनिक दलाची पुनर्स्थापना केली.पोलीस उपनिक्षक असताना कधीही गुन्हे होवू नये याकरिता प्रबोधन करत असत असे हे लोकाभिमुख न्यु.बुधवार पेठ,डाॅ.आंबेडकर नगर येथील रहिवाशी आंबेडकरी चळवळीत अग्रणी असलेले प्रा.सिद्धार्थ जाधव यांचे मोठे बंधू केरु रामचंद्र जाधव (वय ६२) यांचे आज आकस्मिक निधन झाले. पोलिस खात्यात पोलिस उपनिरिक्षक या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले होते.सोलापूरातील आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.समता सैनिक दलाचे कमांडींग आॅफिसर म्हणुन त्यांनी २५ वर्षे कार्य केले.समता बुध्द विहार,समता वाचनालय,बी.आर माॅर्निंग ग्रुप,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समिती आदी संस्थेवर ते काम पाहात होते,त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,दोन मुले,एक मुलगी,दोन बहिणी,सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर कारंबा नाका स्मशानभुमि येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.समता सैनिक दल,शाक्य सेवा संघ व सिद्धार्थ  ब्रिगेड या संस्थानच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी राजकिय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीसोबतच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button