सामाजिक

लाख रुपये नुकसान भरपाई, शंभर टक्के पीक विमा लागू करा – भाई ॲड.नारायण गोले पाटील

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसलेला असून शेतकऱ्याचे संपूर्ण पिके अतिवृष्टीमुळे गेले असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषी मंत्री पाहणीचे आणि पंचनाम्याचे नाटक करत आहेत, वास्तविक अतिवृष्टीमुळे शेतकरी शंभर टक्के उध्वस्त झालेला असताना शेतकऱ्यांना लाख रुपये नुकसान भरपाई देऊन १००% पीक विमा लागू करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली. आणि शंभर इशारा शेकडो कार्यकर्त्यांनी तहसील समोर प्रचंड घोषणाबाजी केली व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला, शेतकऱ्यांच्या नुकसानीची एकरी लाख रुपये नुकसान भरपाई व १००% पीक विमा लागू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई ॲड नारायण गोले पाटील, तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ, भाई चांगदेव शेजुळ, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक बाप्पा कुलकर्णी, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका चिटणीस भाई आनंत चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सहचिटणीस भाई राहुल सोळंके भाई सतीश शेजुळ,भाई राधाकृष्ण पांचाळ, भाई श्रीराम शेवाळे, शेतकरी सभेचे तालुका अध्यक्ष भाई सुदाम चव्हाण, शेतकरी सभेचे तालुका चिटणीस भाई माऊली चंदनशिव, भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, भाई विष्णू शेळके, भाई भास्कर कांबळे, भाई राजेभाऊ शेरकर आदी उपस्थित होते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button