शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात संपन्न..!

करमाळा ( आयुब शेख )
जगातले सर्वांत उंचीवर लढलेले गेलेले युद्ध म्हणजे कारगिल युद्ध होय. भारतीयांचा विश्वास घात करून पाकिस्ताने घुसखोर कारगिल मध्ये घुसवत काराकोरम महामार्गावर नियंत्रण मिळवून सियाचीन भारतापासून तोडण्याचा प्रयत्न पाकिस्ताने केला होता. मात्र, भारतीय सैनिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे युद्ध लढून पुन्हा भारतीय चौक्या मिळवल्या. या युद्धाला आज २५ वर्ष पूर्ण झाले.यानिमित्ताने करमाळा तालुक्यात आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आले.यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.गणेश करे-पाटील यांनी शहिदांना मानवंदना देत वीर माता,वीर पिता आणि वीर पत्नी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत भारतीय सैनिकांच्या शौर्याचे जयगान केले.
यावेळेस सैनिकांसाठी सेवाभावी काम केल्यामुळे प्रा.गणेश करे-पाटील यांना सैनिक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच योद्धा करिअर अकॅडमीचे सुभेदार मेजर विलास नाईकनवरे,श्री.सुरेश आदलिंग,श्री.शिवाजी भंडारे ,मा.श्री.गजेंद्र पोळ (पत्रकार, शेटफळ) मा.श्री.कल्याणराव साळुंके (पक्षीमित्र, दिगंबरराब बागल माध्य.विचालय,कुंभेज,अश्विनी कुंभार( कृषी सहाय्यक पदी निवड) साजिद शेख(माजी सैनिक रूग्णवाहिका), कु.श्रीनाथ उदमले (महाराष्ट्र पोलिस दलात निवड)मेजर मनेश पाटील,नाईक सुभेदार बोलभट साहेब यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळेस विचारपीठावर सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे साहेब,अॅड बाबुराव हिरडे,मेजर अक्रुर शिंदे,मेजर डोंगरे,मेजर
शहिद मेजर अमोल निलंगे यांचे पिताश्री अरविंद निलंगे आणि मातोश्री अंजली निलंगे,सचिन गात सर, पोलीस अधिकारी पवार साहेब,कृषीभूषण नानासाहेब साळुंके,वैभव पोळ,प्रशांत नाईकनवरे,संतोष कांबळे,रूग्णसेवक विकी मोरे,ज्ञानेश्वर धनके,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळेस करमाळा तालुक्यातील सर्व वीर पत्नी ,शहीद पत्नी ,वीर माता, वीर पिता, व मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले.
यावेळेस मा.श्री.साजिद शेख यांनी सुरू केलेल्या माजी सैनिक सेवा रूग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन सी सी विभागाचे विद्यार्थी यांना सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.योद्धा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे भाऊसाहेब माने,दिगंबरराब साळुंके,प्रा.राम काळे सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर अक्रुर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माया भागवत व मेजर किरण ढेरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले .