राजकीय

सोलापूरची विमानसेवा, रेल्वे आणि पाणी या प्रश्नावर लक्ष वेधत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ओढले ताशेरे…

सोलापूर, ( प्रतिनिधी ) : शहरात विमानतळ आहे पण विमानसेवा नाही. रेल्वे आहे पण निर्धारित वेळेपेक्षा चार पास तासाने उशीरा धावते ही बाब चिंताजनक असून सोलापुरातून अनेक नेते होऊन गेले. मात्र, सोलापूरचा विकास आहे त्याठिकाणीच असल्याचे प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधत सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न प्रसंगी श्री दानवे बोलत होते.
शहरातील सैफुल परिसरात  जिल्हाप्रमुख  संतोष पाटील यांच्या व शिवसेना शाख़ा उद्घाटन कार्यालयाचे उद्घाटन अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, आमदार प्रवीण स्वामी, उपनेते अस्मिता गायकवाड,लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे,गणेश वानकर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, राज्य विस्तारक सिद्धाराम शीलवंत युवा सेना जिल्हाधिकारी बालाजी चौगुले, उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर उपशहर प्रमुख संतोष घोडके शिवा माळी,सचिन माने महिला आघाडी संघटक प्रिया बसवंती, शहर संघटिका मीनल दास,शशिकला चोडशेट्टी तालुकाप्रमुख रवी घंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे बोलताना श्रीयुत दानवे म्हणाले,शिवसेना पक्ष हा जनतेचे आणि शेतकऱ्यांचे कामे करणारा पक्ष आहे. सोलापूरचा महत्वकांक्षी असलेला पाणी प्रश्न बाबत प्रत्येक वर्गातून आंदोलन करा. या संपर्क कार्यालयातून रंजले गांजल्याचे प्रश्न सोडवा जनता नेहमी आपल्या पाठीशी उभे राहील असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील म्हणाले या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना व प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. संपर्क कार्यालय २४ तास सर्वसामान्य जनतेसाठी खुले असेल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button