सामाजिक

तरुणांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे : अजित गायकवाड

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )- समाजकार्यास सुरुवात करण्याअगोदर तरुणांनी शिक्षणास प्राधान्य द्यावे. उच्च शिक्षित तरुण समाजात परिवर्तन घडविता असतो, असे प्रतिपादन समाजसेवक अजित गायकवाड यांनी केले. ते संतोष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तरुणांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

संतोष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तरुणांसाठी ‘सामाजिक जबाबदारी’ या विषयावर एक दिवसीय शिबिर ‘रूपाभवानी बगी’च्या या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरास भेट देऊन नगरसेवक रवी गायकवाड, अजित गादेकर, पिंटू डावरे, प्रा. रोहन जामगेकर, प्रा. डॉ. सचिन कांबळे, प्रा. सचिन गायकवाड, प्रा. अरविंद नडखांबे, अॅड गौतम जगझाप, रितेश प्रधाने, प्रा. प्रकाश कांबळे, सचिन (भाऊ) गायकवाड, गौस पटेल, अमित सुर्वे, महेश गजधाने, अश्विन गायकवाड आदींनी तरुणांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा वेळी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्ष – प्रथमेश सोनकांबळे; उपाध्यक्ष – रोहन चितारे, प्रथम साबळे, चिदंबर रुपनर, सार्थक कांबळे, सचिव – विश्वराज सावंत; खजिनदार – सोनू बाबरे; सहखजिनदार – संकेत सातपुते, संग्राम भोसले; सह सेक्रेटरी – विराट कुरा; विश्वस्त – अहिंसक इंगळे, सुरज गायकवाड, प्रथमेश जाधव, प्रथमेश सुर्वे, मिरवणूक प्रमुख – अश्वत खळसोडे यांची निवड करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे नितीन कांबळे, सचिन बनसोडे, आनंद सीताफळे कुणाल शिंदे, अभिजीत कांबळे, अंबादास कोणे, बसू कदम, प्रणव महमाने, यांनी परिश्रम केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक संचित गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन संतोष कांबळे व आभार प्रदर्शन संतोष गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button