माजलगाव येथे शेकापचा तब्बल दोन तास रास्ता रोको

पिक विमा, कर्जमाफी द्या अन्यथा उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार.. भाई ॲड.नारायण गोले पाटील
माजलगाव ( नाजेर कुरेशी ) गेल्या दहा वर्षात शेतकरी आणि शेती प्रचंड संकटात असून शेतकरी हजारोंच्या संख्येने आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकार तयार नाही याउलट अंबानी अदानी यांना कोट्यावधी च्या खैराती वाटण्यात सरकार व्यस्त आहे, गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याचा आत्महत्येचा आकडा हजाराच्या संख्येने वाढत असताना त्यावर तोडगा काढायला सरकारकडे वेळ नाही, गेल्या दहा वर्षात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या केवळ शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशिर हमीभाव न मिळाल्यामुळे झालेल्या असल्याने शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कर्जमाफीसह पिक विमा, हमीभाव द्यावा अन्यथा अजित अजित पवार यांचा बिड जिल्ह्यात ताफा अडवणार असे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी आंदोलनादरम्यान व्यक्त केले,
माजलगाव येथे परभणी फाट्यावर आज दिनांक २९ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पिक विमा देऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या.जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात सोडा. लोकनेते कारखान्याकडील थकीत रकमेची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, माजलगाव तालुक्यातील सर्वच पांदण रस्त्याचे मुरूम खडीकरण करा, अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या शेकाप च्या अन्नत्याग आंदोलनाच्या मागण्या मान्य करा आदि मागण्यासाठी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला, त्यावेळी वाहनाच्या तब्बल तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी श्री पुराणिक व तलाठी आभारे यांनी स्वीकारले तर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता, या आंदोलनासाठी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ,नुमान चाऊस,फजलुभाई भाई पटेल, बालासाहेब येवले,निलाराम टोळे, उल्हास घाटुळ,नितिन काळे, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सह चिटणीस भाई सतीश शेजुळ, शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष भाई अशोक कुलकर्णी, भाई मयूर पांचाळ,भाई राजेभाऊ शेरकर, भाई राजेश्वर मोरे,भाई माऊली चंदनशिव, भाई सुदाम चव्हाण, भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, भाई आनंत चव्हाण, भाई भास्कर कांबळे, संभाजी चव्हाण, श्रीराम शेवाळे, सोनाजी जाधव, नारायण पांचाळ, गणेश चव्हाण, बालासाहेब शिंदे, विक्रम सोळंके, श्रीराम कोरडे, जगदीश शिंदे, पांडुरंग वैद्य, लक्ष्मण बानाईत,मोहन शिंदे,सोनबा वगरे,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी परिसरातील हजारो शेतकरी बांधवांनी आंदोलनाला उपस्थिती लावली.