राजकीय
अक्कलकोट युवक काँग्रेसचे मालवण पुतळा प्रकरणी नायब तहसीलदाराना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही घटना दुर्दैवी असुन राज्य सरकारची जबाबदारी असुन देखील ते कबुल होत नाहीत ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील व आदित्य ठाकरे गेले असता राणे पितापुत्राने जो गोधंळ घातला तो निदंजनक आहे.असे ता युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सागितंले
या पुतळा पडल्याचे निषेधार्थ व संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी याबाबत अक्कलकोटचे नायब तहसीलदार पवार यांना राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतिने निवेदन देण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते. या पुतळा बसविण्याचा कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असुन याचे नेतृत्व कराणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जि.पचे माजी कृषी सभापती मल्लीकार्जुन पाटील यांनी केले.
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी सरकारचा निषेध केला.
याप्रसंगी माजी जि प सभापती मल्लिकार्जुन पाटील बाबासाहेब पाटील,सद्दाम शेरीकर,मुबारक कोरबु, अरुण जाधव ,इरणा धसाडे,विकास मोरे, श्रीशैल माळी,हर्षदीप गायकवाड,शिवराज पोमाजी,गजानंद जकीकोरे,बालाजी शापवाले,राहुल मोरे,निशांत कवडे,अयाज चंदनवाले,महादेव करमल,धनराज येळमेली,जब्बार बागवान,महादेव चुंगी,हमिद गिलकी,नितीश राठोड,नागनाथ कापसे,आदिसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.