सामाजिक

अक्कलकोट शहरातील हत्ती तलावातील मासे मेल्याने सर्वत्र दुर्गंधी !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विकासाचे काम सुरू असून हत्ती तलावातील पाणी काढल्याने या तलावात असणारे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. नगर परिषदेने या तलावातील मेलेले मृत मासे काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हत्ती तलावाच्या विकासासाठी तलावातील पाणी हे पूर्णपणे काढण्यात आले असल्याने या तलावात पाळण्यात आलेले मासे हे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे या मेलेल्या माशांची दुर्गंधी अनेक भागात पसरली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर , बेडर गल्ली , भीम नगर , नाईकवाड गल्ली , कुंभार गल्ली ,देशमुख गल्ली ,महादेव नगर आदी भागांमध्ये मेलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिकेने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मृत माशांच्या वासामुळे सर्व परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अक्कलकोटच्या नागरिकांसोबतच परगावहून  आलेल्या स्वामी भक्ताना  या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानी हत्ती तलावातील मृत मासे तात्काळ काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button