बार्टी संस्थेच्या वतीने आषाढी वारीत संविधान दिंडीची उत्साही सुरुवात — लोकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे महत्त्व

पुणे – ( अशोक शिवशरण )डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, यांच्या वतीने “संविधान दिंडी” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची आज आळंदी येथे उद्घाटन करण्यात आले.
संविधानाचा अमृत महोत्सव याचे औचित्य साधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या १९ दिवसांच्या प्रवासादरम्यान, संविधानाचे मूल्य, अधिकार आणि प्रस्ताविकेचे महत्त्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
संविधान दिंडीमध्ये सहभागी समताधूतांच्या माध्यमातून पथनाट्य, प्रश्नमंजुषा, प्रस्ताविकेचे वाटप आणि संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री. संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
ही संविधान दिंडी पुणे, सातारा व सोलापूर ह्या जिल्ह्यातून जात असून प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभागी होणारे विठ्ठल भक्त यांना आज संविधानाचे महत्त्व विशद करण्यासाठी संविधान दिंडीचे उद्घाटन आज चारोली फाट्या येथे श्रीमती स्नेहल भोसले, श्रीमती वृषाली शिंदे , अनिल कारंडे तसेच श्रीमती नसरीन तांबोळी प्रकल्प व्यवस्थापक,.महेश गवई, सुमेध थोरात, श्रीमती शितल बंडगर प्रकल्प अधिकारी व बार्टी मुख्यालयातील इतर कर्मचारी व समता दूत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते या सर्वांच्या मदतीने ही संविधान दिंडी लोकांपर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचवण्याच्या यांचा मानस आहे . तसेच उद्घाटन कार्यक्रमा येथे सर्व भक्तगण सोबत संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना मोफत उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
संविधानाच्या शिक्षणाची गंगा भक्तिरसामध्ये मिसळून लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठीचा हा उपक्रम नक्कीच समाजजागृतीस चालना देणारा असा हा उपक्रम आहे या उपक्रमासोबत बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामकाज देखील समता समतादूत यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.