महाराष्ट्र

पुण्यात मोठी दुर्घटना, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

पुणे – आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. मात्र हा पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे. अशातच आता इंद्रायणी नदीवरील हा पूल का कोसळला या मागील कारण समोर आले आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी नदीवरील हा दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल जास्त वजन सहण करण्यास अक्षम होता. परिणामी पर्यटकांचे जास्त वजन झाल्याने हा पूल क्षणात कोसळला. या पुलाचे थेट दोन तुकडे झाले. हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असे असताना या पुलावरून जास्त वजन असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. अपघातावेळीही या पुलावरून दुचाकी जात होती. तसेच पर्यटकही एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होते. हा पूल हवेतही हलत होता. या सर्व बाबींमुळे पूल ओव्हरवेट झाला आणि क्षणात कोसळला.
 रविवार असल्याने आज शासकीय तसेच खासगी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी होती. त्यामुळे आज कुंडमळा हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढली. हा पूल अगोदरच जीर्ण झालेला होता. त्यामुळे तो अचानकपणे कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक अचानक इंद्रायणी नदीत कोसळले.
 मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. या भागात स्थानिक पोलीसही पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत या भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे इंद्रायणी नदी सध्या ओसंडून वाहते आहे. त्यामुळे वाहून गेलेले पर्यटक नेमके किती दूर गेले असतील, याचा अंदाज एनडीआरएफच्या जवानांकडून घेतल जात आहे आणि बचावकार्य केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button