सामाजिक
अक्कलकोट शहर बस स्थानक येथील दक्षिण बाजूस पायवाट सुरू करण्याच्या मागणीला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टाई मुळे यश

पायवाट पुर्ववत करण्याचे परिवहन मंत्र्याचे एसटी मंडळाच्या अधिकाऱ्याना आदेश
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
एसटी महामंडळाने जुनी पायवाट रस्ता कंपाऊंड वॉल बांधुन बंद केल्याने महिबुब तांबोळी यांनी एसटी डेपो समोर गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले होते.माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते. सिद्धाराम म्हेत्रे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून जुनी पायवाट चालू करण्याची विनंती केली होती.त्यावेळेस सरनाईक यांनी संबंधित विभागाला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पायवाट चालू करण्याचे आदेश दिले.सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिष्टाईला यश आल्याने उपस्थित लोकांनी त्यांचे आभार मानले.
अक्कलकोट येथील बस स्थानकाच्या दक्षिण बाजूस जनतेला ये जा करण्यासाठी पायवाट रस्ता संबंधित विभागाने कंपाऊंड बांधुन बंद केल्याने गरोदर महिला, वयोवृद्ध,शाळकरी मुले,बॅक व आठवडे बाजारासाठी कामानिमित जाणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय झाली होती.सर्व जाती धर्माच्या लोकांना झालेली गैरसोय दूर व्हावी यासाठी महिबूब तांबोळी यांनी उपोषणास बसले होते.सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन पायवाट संदर्भात
संबंधीत परिवन मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरला आले असता सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे.महिबूब तांबोळी यांना उपोषण सोडण्याचे शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी विनंती केली.विनंतीला मान देऊन तांबोळी उपोषण माघारी घेतले.यावेळी विरक्त मठाचे .बसवलिंग महास्वामी सय्यद,दातापिर बाब, बसलींगप्पा खेडगी,सद्दाम शेरीकर , मल्लिकार्जुन पाटील,गुरु म्हेत्रे,,सुनील खवळे, मोहसीन मोकाशी,इरफान दावण्णा,अतिक अरब, युसुफ जमादार आदी उपस्थित होते.