सामाजिक

श्री विठ्ठल पाटील गवळी यांच्या पाठपुरावामुळे हुस्सा येथील मागासवर्गीय व कुंटूर येथील अल्पसंख्यांक बांधवांच्या पात्र घरकुल लाभार्थ्यांना मिळाला न्याय…..

.

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात वंचित राहिले असून वंचित घरकुल लाभार्थ्यांच्या हाकेला धावून मा श्री विठ्ठल पाटील गवळी यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे व पाठपुराव्यांची प्रशासनाने दखल घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
सदर पात्र घरकुल लाभार्थ्यांकरिता प्रधान सचिव ग्रामविकास तथा पंचायत राज विभाग यांच्याकडून संबंधित विभागाकडे संदर्भीय पत्र काढून पत्र क्रमांक m- 12018/2019-rh(m&t)part (1) दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी चे पत्र
2) मा प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक प्रआओ -ग्रा 2024/प्र. क्र. 166/ योजना 10 दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 चे पत्र काढून संबंधित विभागांना पात्र घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत दोन कोटी घरकुलांचे बांधकाम पुढील पाच वर्षे सन 2024 -25 ते 2028- 29 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सुरू केली आहे. सदर सर्वेक्षण हे तातडीने करण्याचे ग्राम पंचायत स्तरावर करण्याचे आदेश देऊन व पात्र घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्याचे आहे. तरी त्याच अनुषंगाने हुस्सा येतील मागासवर्गीय समाज बांधवांचे व कुंटूर येथील अल्पसंख्यांक बांधवांचे आणि तालुक्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण नोंद करून व त्यावर तात्काळ निर्णय घेऊन पत्र घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्याचे संबंधित विभागाकडून माननीय विठ्ठल पाटील गवळी यांना सांगण्यात आले आहे हे एकंदरीतच विठ्ठल पाटील गवळी यांच्या मागणीला मोठे यश आल्याचे सांगण्यात आले आहे. श्री विठ्ठल पाटील गवळी यांनी सामाजिक बंदलकी जोपासत व राजकीय प्रवाहाच्या माध्यमातून आणि त्यांच्या अति परा कष्टातून वंचित घरकुल लाभार्थ्यांना मिळत आहे. अशा प्रकारची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.नायगाव तालुक्यातील सह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात घरकुलधारक वंचित राहिले असल्याने व पात्र घरकुल लाभधारक यांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पात्र घरकुल लाभधारकांनी विषयी संबंधित प्रशासनाला सर्वेक्षण करून नोंदी पाठवण्यास मोठ्या प्रमाणात भाग पाडून समाजातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम केल्याचे देखील सांगण्यात आले आहे म्हणून समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष युवक मा श्री विठ्ठल पाटील गवळी यांचे घरकुल लाभधारकाकडून कौतुकाची थाप मिळताना दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button