शैक्षणिक

नागनहळळी आश्रमशाळेत ७६ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

        अक्कलकोट (प्रतिनिधी):नागनहळळी येथील आश्रमशाळा शिक्षण संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात अला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव जावेद पटेल 
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विजयकुमार काकडे, अॅड. श्रीमती  हल्ले , अॅड. श्रीमती बाके , अॅड. पिरजादे , संस्थेचे उपाध्यक्ष अ. जलील पटेल ,  पत्रकार  मारुती बावडे, नंदकुमार जगदाळे,  रमेश भंडारी,  राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड,  मोहन बंदिछोडे नागनहळळी गावचे उपसरपंच रमेश चव्हाण,मोहन चव्हाण , प्राचार्य मुजावर आय. एम., मुख्याध्यापक रईस अहमद शेख आदी  उपस्थित होते.
   या प्रसंगी  माजी सैनिक सुभेदार वियजकुमार काकडे यांच्या शुभ हस्ते ध्वजरोहण करण्यात आला. प्रशालेतील विदयार्थ्यांनी संचलनाच्या माध्यमातून ध्वजाला मानवंदना दिली. सांस्कृतिक विभागातंर्गत अनेक देशभक्तीपर गीतगायन,नृत्ये व विदयार्थी मनोगते सादर करण्यात आली. कु. सानिका भोरे हिने राष्ट्रभाषेतून मनोगत व्यक्त करताना अतिशय मार्मिक शब्दात अनेक समस्यांची उकल करुन विदयार्थी म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली.
तसेच अॅड. पिरजादे  यांनी संस्थेचे आपल्या मनोगतात संस्थेने उपलब्ध करुन दिलेल्या शैक्षणिक व भौतिक सोयी सुविधा बद्दल गौरवदगार काढले. तसेच माजी सैनिक काकडे यांनी एक आदर्शवत आश्रमशाळा असल्याचा उल्लेख आपल्या मनोगतात केला. अॅड. श्रीमती  हल्ले  यांनी ही आश्रमशाळा एखादया कॉनव्हेंट शाळेपेक्षा कमी नाही असा उल्लेख केला.
    याप्रसंगी विशेष सन्मान म्हणून प्रशालेची माजी विदयार्थिनी कु. नागम्मा बजे हिची बांबू उडी या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने आर्थिक मदत देवून तिचा यथोचित सन्मान करण्यात आला.
   आश्रमशाळा विभागाच्या जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेत शाळेतील विदयार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविल्याबददल त्या विदयार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व छोटीसी भेटवस्तू देउन गौरव करण्यात आला. वर्षभरात विदयार्थ्यांची सर्वागीण प्रगती लक्षात घेउन तीन विदयार्थी व विदयार्थीनीची आदर्श विदयार्थी म्हणून निवड करुन त्यांना प्रशस्तीपत्र व छोटीसी भेटवस्तू देउन त्यांचा सन्मान करण्यात आला.
    अध्यक्षयीय मनोगतात प्राचार्य . मुजावर आय. एम. यांनी विदयार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पी. एस. सोनटक्के तर सूत्रसंचलन प्रा.चव्हाण एस.बी.व प्रा. जगताप एम. वाय. यांनी केली. तर आभार  बिराजदार बी. व्ही. यांनी मानले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button