राजकीय
खोटे बोलणाऱ्या नेत्यांपासून सावध रहा – खासदार मल्लिकार्जून खरगे

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) डबल इंजिन सरकार आहे पण हे सरकार डबल इंजिनच नव्हे तर पक्ष चोरांचे सरकार आहे त्यांनी खोटे बोलून दिल्लीत सत्ता मिळवली.आता राज्यातही हे लोक तोच पॅटर्न वापरत आहेत यांच्यापासून सावध राहा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातला काळा पैसा आणून देशाचा विकास करू असे म्हटले होते.१५ लाख रुपये आपल्याला देऊ, देशात दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशा प्रकारच्या घोषणा करून सत्तेवर आले.प्रत्यक्षात काहीच केले नाही.या
खोटे बोलणाऱ्या नेत्यांपासून सावध रहा
असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी केले .अक्कलकोट येथील कांदा बाजार प्रांगणात बुधवारी आयोजित जाहीर सभेत खासदार खर्गे बोलत होते.यावेळी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,उमेदवार
सिद्धाराम म्हेत्रे, कर्नाटकचे मंत्री एम.बी पाटील,अफजलपुरचे आमदार एम.वाय.पाटील,आळंदचे आमदार
बी.आर पाटील,निरीक्षक वीणा काशपनवर,डॉ.धवलसिंह मोहिते
पाटील,चेतन नरोटे,काँग्रेस तालुकाध्यक्ष
शंकर म्हेत्रे,ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद
पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष रईस टिनवाला,मल्लिकार्जुन पाटील,युवा नेते
शिवराज म्हेत्रे,महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष
शितल म्हेत्रे,शिवसेनेचे आनंद बुक्कानूरे, बंदेनवाज कोरबू, बाबासाहेब पाटील,
व्यंकट मोरे, विश्वनाथ भरमशेट्टी,अशपाक अगसापुरे, सिद्धार्थ गायकवाड,संजय गायकवाड, सिद्धाराम भंडारकवठे ,पिंटू पाटील,अरुण जाधव आदींची उपस्थिती होती
पुढे बोलताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले ,केंद्रात खोटे
बोलणारे सरकार आले. तर राज्यात पक्ष
चोरांचे सरकार आले.त्यांना सर्वसामान्य
जनतेचे काही देणे घेणे नाही. या जातीयवादी आणि फसव्या सरकारला यावेळी हद्दपार करा.आता परत तुमच्याकडे येतील.हात जोडतील आणि खोटे बोलून दिशाभूल करतील त्यांचे अजिबात ऐकू नका.आपल्याला महाराष्ट्रात एक चांगले स्थिर सरकार द्यायचे आहे आणि लोककल्याणकारी योजना राबवून राज्याचा विकास करायचा
आहे,महाराष्ट्रात कोणाचे तरी पक्ष चोरून भाजपने सरकार आणले गेले.लोकांनी निवडलेले हे सरकार नाही आणि हे जनतेमध्ये फार दिवस
टिकणार नाही.त्यांच्याकडे कोणतेही विचार नाहीत आयडॉलॉजी नाही ते चांगल्या मार्गाने
जाणारे लोक नाहीत अशा लोकांबरोबर
आपण राहणार आहात का असा सवाल
करून तुमच्या पाठिंब्यामुळे राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आपण चांगली कामे करू. देशाला पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची परंपरा
आहे.या लोकांनी देशासाठी बलिदान दिले. भाजपवाल्यांचे देशासाठी काय योगदान आहे,
हे त्यांनी आधी सांगावे मग त्यांनी सत्तेची
स्वप्ने बघावीत.केवळ हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावून देशात
जातिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न
भाजपने केला.आम्ही हम सब एकचा
नारा देत आहोत तर ते देश तोडोची भाषा
करत आहेत याला उत्तर देण्याची ही वेळ
आहे असे सांगून ‘आवाज दो, हम सब एक है’
असा नारा त्यांनी सभेमध्ये दिला. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज ,डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांची विचारधारा आहे यांनी
संपूर्ण जगाला मार्गदर्शन केले तर हे लोक
देशासाठी काही न करता देश विविध जातीने
जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा करत
आहेत,असा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अडीच लाख लोकांना रोजगार देऊ,१००
युनिट पर्यंत प्रत्येकाला वीज मोफत देऊ,वर्षात सहा गॅस सिलेंडर मोफत,युवकांना ४ हजार रुपये मोफत,नियमित शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान,शेतकऱ्यांची ३ लाख पर्यंत सरसकट कर्ज माफी,कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजना सुरू करून महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करू,अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
निवडणुकीत सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडून
द्या. अक्कलकोटचे प्रश्न शिल्लक राहणार
नाहीत. शहरात सुरू असलेल्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा आपण दोन दिवसात करू,अशी ग्वाही खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी दिली.
खासदार प्रणिती शिंदे यांनी लोक भाजपच्या त्रासाला कंटाळून
काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.काँग्रेसची संस्कृती गरिबांसोबत राहणारी आहे.
लाडक्या बहिणींना पैशाचे आमिष दाखवून
मते मिळवण्याचे पाप भाजपवाले करत आहेत.त्याला कदापि यश मिळणार नाही.अक्कलकोटमधून सिद्धाराम म्हेत्रे
यांना यावेळी निवडून द्या.तुमची सर्व
कामे मार्गी लागतील असे म्हणाल्या. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पूर्वी कर्नाटकातही ४० टक्केचे सरकार
होते.तिथल्या सुज्ञ जनतेने त्यांना हटवले.
त्याचपद्धतीने महाराष्ट्रात देखील या ४०
टक्के आणि खोकेबाज सरकारला हद्दपार
करा.या सरकारने सर्व जाती धर्मांमध्ये
भांडणे लावली आणि फसवणूक केली.महात्मा बसवेश्वर महामंडळाला एक दमडीचा निधी दिला नाही.केवळ घोषणा आहेत.जमिनीवर प्रत्यक्षात काहीच नाही.या घोषणाबाजी सरकारला यावेळी घरी बसवा असे आवाहन मतदारानां केले.यावेळी दत्ता थोरे,तुकाराम दुपारगुडे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातलिंग शटगार यांनी केले.आभार मल्लिकार्जुन पाटील
यांनी मानले.या जाहीर सभेमध्ये सैपन मुजावर,अब्दुल पिरजादे,स्वामीनाथ चौगुले ,सचिन अंगुले, सिद्धू सातले, महांतेश सातले, अविनाश अनगले, दिलीप मोरे अविनाश नाईकवाडी, शेखर कुरले, सिद्धू कुरले ,रविराज खसगी आदींनी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती
घेतला.