राजकीय
नुसत्या मंजूरी आकडेवारीवरुन जनतेची दिशाभूल-माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका

…उमेदवारी कोणालाही मिळो-मल्लिकार्जुन पाटील
अक्कलकोट ( प्रतिनिधी- ) मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यासाठी भरपूर प्रकारचा निधी मंजूर केल्याचा गवगवा आमदार सचिन कल्याणशेट्टी करत आहेत.हे खोटे आकडेवारी देऊन ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर केला.
जेऊर ता.अक्कलकोट येथील सभेत बोलताना म्हेत्रे यांनी आरोप केला.यावेळी मा.जि.प.कृषि सभापती मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव,महांतेश पाटील,प्रथमेश म्हेत्रे,अश्पाक बळ्ळोरगी,शिवसेना उ.बा.ठा ता.अध्यक्ष आनंद बुक्कानुरे,बंदेनवाज कोरबु, मा.जि.प.सदस्य पांडुरंग राठोड, सिध्दार्थ गायकवाड,बाबासाहेब पाटील,सिध्दाराम भंडारकवठे,काशिराया पाटील,महेश माने,चन्नवीर बोधले,शिवलिंगप्पा पत्रिगीडा,अलिसाब मुजावर,श्रीमंत राठोड,सुरेश सोनार,रोहित राठोड, इरण्णा कोळी,बसवराज सातले,शिवाजी कलमदाणे ,रवि गायकवाड,विजय गायकवाड व इतर गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हा.चेअरमन कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,प्रत्येक विकासकामे मीच केली हे सांगणे चुकीचे आहे.याच भावनेतुन उजनीचे पाणी कुरनुर धरणात आणल्याचे कल्याणशेट्टी सांगतात.परंतु यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.कुरनुर धरणाच्या निर्मितीवेळी ते शाळेत शिकत होते असा टोला देखील म्हेत्रे यांनी लगावला.
चौकट –
मल्लिकार्जुन पाटील यांचे आवाहन. -दरम्यान जेऊर येथील सभेत बोलताना जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी संभाव्य उमेदवारी बाबत मत व्यक्त केले.ते म्हणाले की महाविकास आघाडीकडून उमेदवारी मला किंवा सिद्धाराम म्हेत्रे या दोघांपैकी कोणालाही मिळाले तरी कार्यकर्त्यांनी झटण्याचे आवाहन केले.