शैक्षणिक

सोलापूरातील लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी ) जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जिल्हा सोलापूर व वालचंद कॉलेज महाविद्यालय एम एस डब्ल्यू कॉलेज आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी  लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. कोलकात्यातील घटनेनंतर सोलापुरातील शाळा – महाविद्यालयांमधून सुराक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. त्यातच एक भाग म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व वालचंद कॉलेज महाविद्यालय एम एस डब्ल्यू विद्यार्थी यांच्यावतीने एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  लाल बहादूर शास्त्री शाळांमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला  
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव .न्या.उमेश देवर्षी ,श्रीमती डॉ.निशा वाघमारे
 एम एस डब्ल्यू विभाग प्रमुख वालचंद 
       कॉलेज महाविद्यालय ,.श्रीमती ॲड.देवयानी किणगी सहाय्यक लोकअभिरक्षक ,ॲड.सिद्धाराम म्हेत्रे  सहाय्यक लोकअभिरक्षक ,डॉ..संदीप जगदाळे 
     एम एस डब्ल्यू वालचंद कॉलेज महाविद्यालय आदीचीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 
यावेळी शाळा मधील विद्यार्थिनींना सांगितलं गुड अन् बॅड टच व कोलकाता मधील घटनेनंतर मुलींच्या सुराक्षिततेवर सर्वच संवेदनशील बनली आहेत शाळांमध्ये तक्रार पेटयाही लावल्या आहेत, शिवाय पोलिसांच्या पथकाच्या गस्तीही वाढविल्या आहेत.. 
यावेळी ॲड.निलम वाडेकर ,ॲड.मनोरमा इंगळे 
ॲड.राहुल होटकर ,ॲड.दिपाली मधुर ,ॲड.एडके शिवानी ,शुभम कसबे ,विजयालक्ष्मी बागडोलू
दामिनी गवते ,रोहित उघडे यांनी
विशेष  परिश्रम घेतले. या कार्यक्रमास  वालचंद महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button