सामाजिक

अक्कलकोट येथे धम्मसेवक आणि धम्मसेविका पुरस्काराचे वितरण

बुद्धाचा धम्मच हा जगाला तारणारा धम्म आहे – सागर सोनकांबळे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

  आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध  जयंतीचा जास्त उत्साह असणे साहजिक आहे. ती जोमाने साजरी करताना आंबेडकरी जनतेने, विशेषतः चळवळीतील तरुणांनी अंतर्मुख होणे गरजेचे आहे. जात ही  मानसिक अवस्था आहे .म्हणून बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेशी बुद्धी आणि कर्तृत्वाने एक हाती लढा देत, वंचित, शोषित  समाजाला जगण्याचा मूलभूत अधिकार मिळवून दिला. त्यांना सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रक्रियेत स्थान देण्यासाठी घटनात्मक तरतुदी केल्या. यातून त्यांनी दलितांचा उद्धार तर केलाच; शिवाय अनेक विरोधाभास आणि विरोधक यांच्याशी संघर्ष करीत लोकशाही समाजरचना, अर्थकारण, शिक्षण, न्यायव्यवस्था, कायदा, संघराज्य रचना, स्त्रियांचे प्रश्न, शेतकऱ्यांचा  लढा, अल्पसंख्याकांचा लढा,कामगारांचे अधिकार, ओबीसी चे अधिकार,अशा अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक व प्रणालीगत बदल घडवून आणले. म्हणून तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व गौतम बुद्धांचे विचार अमलात आणून शेवटच्या व्यक्तीच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाचन हे गरजेचे आहे. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो.हे काम तरुणाने करण गरजेचं आहे. बुद्धाचा धम्म हा आपल्याला विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देतो. धम्माचे पालन करणे ही काळाची गरज आहे.बुद्धाचा धम्मच हा जगाला तारणारा धम्म आहे असे प्रतिपादन शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील विचारवंत  सागर सोनकांबळे यांनी केले.
अक्कलकोट येथील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन आणि भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत महाकारूणी भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त दिनांक १२ मे रोजी धम्म सेवक आणि धम्म सेविका या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय बागेहळळी रोड येथील सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमास राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे प्रमुख तथा रिझर्व बँकेचे माझी मॅनेजर दिलीप कदम , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे , शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे , डॉक्टर रवींद्र बनसोडे , अक्कलकोट बस आगार व्यवस्थापक संजय कांबळे , यशसिद्दी आजी   माजी सैनिक असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध , विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक राजकुमार बनसोडे , डॉक्टर रवींद्र बनसोडे ,प्राध्यापक आबाराव सुरवसे दहिटणे गावचे उपसरपंच विकीबाबा चौधरी , मेजर कमलाकर कांबळे , एसटी बस चालक सोपानराव इंगळे , पत्रकार राजेश जगताप , पत्रकार स्वामीराव गायकवाड आदींचा धम्मसेवक तर मुख्याध्यापिका सिद्धव्वा शिवशरण , शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा संघटक वैशाली हावनूर यांचा धम्म सेविका या पुरस्काराने शाल, पुष्पगुच्छ , पंचशील उपरणे, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विकीबाबा चौधरी मेजर कमलाकर कांबळे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सिद्धाराम घटकाबळे रविराज गायकवाड श्रीशैल शिवशरण , बंटी बनसोडे , दिलीप शिवशरण , सिव्हिल इंजिनिअर शिवशरण भीमाशंकर घटकाबळे, शिवशंकर गुंजले ,किनगे, रोमित मडिखांबे , यशवंत इंगळे  आदींसह  धम्म उपासक ,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनकांबळे यांनी केले तर आभार स्वामीराव गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे प्रमुख दिलीप कदम यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button