सामाजिक

कर्जमाफी न दिल्यास सरकारला धडा शिकवणार..भाई ॲड. नारायण गोले पाटील

माली पारगाव येथे कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी तब्बल आडीच तास रास्ता रोको.

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) गेल्या दहा वर्षात शेतकरी आणि शेती प्रचंड संकटात असून शेतकरी हजारोंच्या संख्येने आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकार तयार नाही याउलट अंबानी अदानी यांना कोट्यावधी च्या खैराती वाटण्यात सरकार व्यस्त आहे, गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याचा आत्महत्येचा आकडा हजाराच्या संख्येने वाढत असताना त्यावर तोडगा काढायला सरकारकडे वेळ नाही, गेल्या दहा वर्षात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या केवळ शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशिर हमीभाव न मिळाल्यामुळे झालेल्या असल्याने शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कर्जमाफी, पिक विमा, हमीभाव द्यावा अन्यथा शेतकरी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी आंदोलना दरम्यान व्यक्त केले,
माली पारगाव फाट्यावर आज दिनांक ३१ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी, सरसकट पिक विमा देऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या. लोकनेते कारखान्या सह सर्वच थकीत रकमेची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, माजलगाव तालुक्यातील सर्वच पांदण रस्त्याचे मुरूम खडीकरण करा, माली पारगावची बस सेवा सुरळीत करा. खरीप २०२०,२०२३ व रब्बी२०२४ चा पीकविमा सरसकट सर्वांना मिळाला पाहिजे, ई-पीक पहाणीची अट रद्द करून सोयाबीन, कापसाला दहा हजार आणि सोयाबीनला सात हजार हमीभाव मिळाला पाहिजे, शेतात जाण्यासाठी पादंन रस्ते झाले पाहिजेत,अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निलाराम टोळे, नामदेव सोजे,अंगद खांबे, अण्णासाहेब म्हस्के, श्रीराम कोरडे, श्रीराम शेवाळे,अनंत शिंदे यांच्या सह शेतकरी संघटनेचे गंगाधर बापु गायकवाड, अर्जुन भाऊ कदम, बाबुराव मामा रद्दे, पांडुरंग रद्दे, विठ्ठलराव राठोड, महादेव गायकवाड, उद्धव गायकवाड, किशोर गाडेकर,ईश्वर सोजे, ओमकार ढिसले, यांच्या सह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित तलाठी,मंडळाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त राखला.यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला, त्यावेळी वाहनाच्या तब्बल तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button