ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

अकोट ( जफर खान )ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा पार पडला. दिनांक २३/०८/२०२४ रोजी दाबका येथिल जि.प.पु.मा.शाळा येथे दरवर्षी प्रमाणे साईबाबा ग्रामीण विकास संस्था , अंतर्गत ग्रामसेवा लोक अभियान ( विदर्भ )चांदूर रेल्वे यांचे द्वारा मेलघाट मधील गरीब गरजु विद्यार्थी यांना हात मदतीचा उपक्रम संस्थेच्या वतीने वही , बुक व इतर शालेय साहित्य संस्थेचे अध्यक्ष . बंडूभाऊ आंबटकर , शीतलताई पाटील अध्यक्ष महीला सामाजिक संस्था नागपुर , रंजिताताई तराळे , सपोर्ट पर्सन बाल कल्याण समिति यांच्या तर्फे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षा पासुन संस्था गरजु लोकांन पर्यंत पोहचुन त्यांच्या समस्या समजुन त्या पूर्ण करण्याचे कार्य करत असते मग ती शासकीय असो वैद्यकीय असो की कुठल्या लाभा पासुन वंचित असो साईबाबा संस्था ते पूर्ण करण्याचे काम करते. विशेष म्हणजे बालविवाह , शाळा बाह्य विद्यार्थी , किशोरी विकास कार्यक्रमामधून मार्गदर्शन, , बालमजूर थांबाविन्याचे काम संस्थे च्या वतीने मोठ्या जबाबदारीने पार पाडले जाते .याचाच एक भाग म्हणजे दाबका येथे शाळेतील गरजू विद्यार्थी यांना आज रोजी शालेय साहित्य व रक्षा बंधन सोहळा हा दुहेरी उपक्रम मोठया उत्साहात पार पडला या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित काकपुरे सर यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक संदीप चौहान सर , प्रदीप हरले सर , हीरालाल सोळंके सर नंदलाल कास्देकर सर , भारत कासदेकर सर संगणक शिक्षक , मेलघाट मध्ये समाज सेवेसाठी ओळखले जानारे असे आदर्श पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे ,विनोद भिलावेकर ग्रामपंचात सदस्य , दिलीप भिलावेकर शाळा समिती अध्यक्ष , तुलसीबाई वाघमारे हे उपस्थित होते.