टॉप न्यूज
विश्वविख्यात महानतम गायक स्वर्गीय किशोर कुमार उर्फ आभास कुमार गांगूली

(जन्म 4 ऑगस्ट 1929_ मृत्यू 13 ऑक्टोबर 1987)
संगीत विश्वातील अदभुत चमत्कार असा सार्वकालिक सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट हरफन मौला;बहुआयामी; ऑल राऊंडर असा कलंदर कलावंत; गायक;संगीतकार; शायर;लेखक;गीत-
रचनाकार;अभिनेते;दिग्दर्शक; पटकथा-
संवाद लेखक असे हरहुन्नरी,अष्टपैलू;
कलाकार महान स्वर्गीय पार्श्वगायक ‘किशोरकुमार’ जी ह्यांचे जयंती दिन निमित्ताने सर्वोत्तम महानतम गायक ‘किशोरकुमार’ यांचे अगणित अजरामर संगीतमय बेजोड़ बेहतरीन सदाबहार गाणी तसेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक विविध क्षेत्रे व विशेषतः संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल व संगीत सेवेसाठी आम्हां संगीतप्रेमी धोपावकर बंधु- भगिनी आणि मित्र परिवार,अहमदनगर त्याचप्रमाणे किशोर
कुमार यांचे संपूर्ण जगभरातील अब्जावधी चाहते संगीतप्रेमी श्रोत्यांचे वतीने कोटि-कोटि सादर प्रणाम।
किशोरकुमार हे महानतम भारतीय पार्श्वगायक,गायक, अभिनेता,गीतकार,संगीतकार,निर्मा ता,दिग्दर्शक,पटकथा संवाद लेखक होते.
हिंदी शिवाय,त्यांनी बंगाली,मराठी,
आसामी,गुजराती, कन्नड,भोजपुरी, मल्याळम व उर्दू यासह अनेकविध भारतीय भाषांमध्ये गायन केलेले आहे. किशोरकुमार यांचा जन्म मध्य प्रदेशात खांडवा या गावी झाला.त्यांचे नाव आभासकुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते,आई गौरी देवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या.किशोरकुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते.
इतर भावंडे अशोक
कुमार,सतीदेवी व अनूपकुमार.अशोककुमार हिंदी फिल्म इंडस्ट्री(बॉलीवुड) मध्ये सुप्रसिध्द झाल्यावर,गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले.आभास
कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोरकुमार ठेवून आपली फिल्मी कारकिर्द सुरु केली. बॉम्बे टॉकीज मध्ये ते समूह गायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट “शिकारी”
(१९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरकुमार यांना “जिद्दी” (१९४६) या चित्रपटासाठी गीत गाण्याची प्रथम संधी दिली. हे गाणे होते “मरने की दुआएँ क्यों मांगूँ”. यानंतर किशोर कुमार यांना गाणी गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्याने १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.*
*बाँम्बे टॉकीजच्या फणी मजूमदार दिग्दर्शित केलेल्या “आंदोलन”(१९५१) या चित्रपटात त्यांनी हिरोचे काम केले. आपल्या भावाच्या अशोककुमार यांचे मदतीने किशोर कुमारांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्हावयाचे होते.किशोरकुमार यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण मोठे भाऊ अशोक कुमार यांना घाबरत असल्याने ते अभिनय करीत राहिले.खरे पाहता
किशोर कुमार हे संगीत शिकलेले नव्हते.सुरुवातीला ते महानतम गायक के.एल्.सैगल यांची नक्कल करीत होते. तत्कालीन सुप्रसिध्द
संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर कुमार यांची गायकी खूप आवडे
.त्यांच्या सल्ल्या अनुसारच किशोर कुमारांनी प्रख्यात गायक “कुंदनलाल सैगल” यांची नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट गायन शैली निर्माण केली.
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकां बरोबर काम केलेले आहे. हृषीकेश मुख़र्जीं बरोबर “मुसाफिर”; बिमल रॉय बरोबर “नौकरी” (१९५४) चित्रपटात काम करतांना संगीतकार
सलिल चौधरी हे किशोरकुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते,पण किशोर कुमार चे गाणे ऐकून,त्यांनी हेमंतकुमार ऐवजी किशोर कुमार यांना “छोटा सा घर होगा” हे गाणे गावयास दिले.किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरुवातीला केले,
उदाहरणार्थ,बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परंतु बॉक्स ऑफिसवर यातील कोणताही चित्रपट चालला नाही.किशोरकुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट “दूर वादियों में कहीँ” होता.
.राहुल देव बर्मन व राजेश रोशन यांच्या पाठिंब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्व गायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपूर च्या पहिल्या चित्रपटासाठी (वो सात दिन) तसेच (मिस्टर इंडिया) या
पहिल्या सुपर हिट चित्रपटासाठी गाणी गायिली.कारकिर्दी चे शेवटच्या टप्प्यात किशोर कुमारने संगीतकार आर.डी. बर्मन साठी “सागर” चित्रपटातील गाजलेली सुप्रसिध्द गाणी गायली.याच कालावधीत त्यांनी निवृत्त होऊन जन्म गावी खांडव्याला जाण्याचे ठरवले. परंतु १३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदय
विकाराने त्यांचे निधन झाले.त्यांचे इच्छेनुसार किशोर कुमारांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.किशोर कुमार यांनी एकूण चार लग्ने केलेली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता ऊर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष यांचे बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत राहिले. किशोर कुमार यांची दुसरी पत्नी प्रख्यात अभिनेत्री मधुबाला होती.मधुबालाने किशोर कुमारांचे बरोबर “चलती का नाम गाड़ी”(१९५८) सारख्या बर्याच चित्रपटात कामे केली.त्यांचा विवाह १९६१ मध्ये झाला त्यावेळी मधुबाला ही असाध्य रोगाने आजारी असलेने दोघांनी कोर्ट मॅरेज केले नंतर लगेचच मधुबाला ऑपरेशन करण्यासाठी लंडन
येथे गेली होती.परंतु तेथील डॉक्टरांनी मधुबालांचे जीवाला धोका असल्यामुळे त्यांचेवर ऑपरेशन केले नाही.मधुबालाअसाध्य आजारी असूनही मधुबालाचे
अंतिम क्षणापर्यंत किशोर कुमार व मधुबाला यांचे लग्न मधुबाला यांचे मृत्यु २३ फेब्रुवारी १९६९ होईपावेतो ९ वर्ष पर्यंत टिकले होते. १९७६ ला किशोर कुमारांचे तिसरे लग्न अभिनेत्री योगिताबालीशी झाले.ते लग्न ४ ऑगस्ट १९७८पर्यंत टिकले.नंतर किशोर कुमारांनी १९८० साली अभिनेत्री लीना चंदावरकर यांचेशी चौथे लग्न केले ते शेवट पर्यंत किशोर कुमारांचे मृत्यु पर्यंत टिकले. किशोरकुमार यांना रुमा घोष पासून अमित कुमार व लीना चंदावरकर पासून सुमित कुमार ही दोन अपत्ये आहेत.
किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केलेले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट ::- पडोसन
(१९६८),दूर गगन की छाँव में(१९६४)
,गंगा की लहरें (१९६४),मिस्टर एक्स इन बाँम्बे (१९६४),हाफ टिकट (१९६२),
मनमौजी (१९६२), झुमरू (१९६१),
चलती का नाम गाडी (१९५८),
दिल्ली का ठग (१९५८),आशा (१९५७), न्यू दिल्ली (१९५६),बाप रे बाप (१९५५),मिस माला (१९५४),
नौकरी (१९५४) इत्यादी.किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायलेले आहेत. किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे लेखन करून त्यात संगीत ही दिले.त्या पैकी ६ चित्रपट अपूर्णच राहिले. किशोर कुमार यांनी पाच चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी दोन चित्रपट अपूर्ण राहिले. किशोर कुमार यांनी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.
.इंदिरा गांधींनी भारतावर लादलेले आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला.
किशोर कुमारांना आठ वेळा फ़िल्म
फेअर चा सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळालेला आहे.वर्ष_गाणे_चित्रपट_संगीतका र_ गीतकार.*
१९६९ “रूप तेरा मस्ताना”,आराधना ,राहुल देव बर्मन, आनंद बक्षी.१९७५ “दिल ऐसा किसी ने”,अमानुष, श्यामल मित्रा.१९७८ “खैके पान बनारसवाला”,डॉन, कल्याणजी- आनंदजी,अनजान
१९८० “हज़ार राहें मुडके देखीं”, थोडीसी बेवफाई, खय्याम, गुलज़ार.१९८२ “पग घुँघरू बाँध”,नमक-हलाल, भप्पी लहिरी, अनजान.१९८३ “हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते”, राहुल देव बर्मन,गुलशन बावरा. १९८४ “मंजिलें अपनी जगह”,शराबी, भप्पी लहिरी. १९८५ “सागर किनारे”, सागर, राहुल देव बर्मन, जावेद अख्तर.मध्य प्रदेश सरकार किशोर कुमार अलंकरण नावाचा पुरस्कार सन १९९८ पासून दरवर्षी, हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंधित एका व्यक्तीला देते.
