महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी

पुणे – ( प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सीएससी विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय), डीएपीएसए, आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष विद्यार्थी आघाडी यांनी आज गुरुवारी कुलगुरूंना निवेदन देऊन यूजीसी मान्यताप्राप्त यूपीएससी आणि एमपीएससी स्पेशल बॅच तत्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
ही स्पेशल बॅच मागील दोन वर्षांपासून खंडित आहे. याआधी या बॅचमध्ये यूपीएससीसाठी ५२ जागा आणि एमपीएससीसाठी ५२ जागा उपलब्ध होत्या. या दोन्ही बॅचमधील प्रत्येकी ५२ जागांपैकी २० जागा अनुसूचित जाती (एससी) आणि १० जागा अनुसूचित जमाती ( एसटी) विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या.
विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले की, यावर्षी विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या बॅचमध्ये फक्त ॲड-ऑन बॅच म्हणून यूपीएससीच्या ४० जागा आणि एमपीएससीच्या ४० जागा सुरू केल्या आहेत. त्यासाठी राखीव वर्गातील विद्यार्थ्यांकडून ₹७,५०० आणि ओपन वर्गातील विद्यार्थ्यांकडून तब्बल ₹३०,००० फी आकारली जात आहे. शिवाय या नव्या बॅचमध्ये एससी-एसटी राखीव जागा पूर्वीपेक्षा कमी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे की, ॲड-ऑन बॅच सुरू ठेवावी, पण त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून बंद असलेली यूजीसी मान्यताप्राप्त मूळ स्पेशल बॅच — ज्यामध्ये यूपीएससीच्या ५२ जागा व एमपीएससीच्या ५२ जागा असून, त्यातील २० एससी आणि १० एसटी राखीव जागा कायम आहेत — ती पूर्ववत सुरू करावी.
चौकट – एससी,एसटी, ओबीसी आणि बहुजन विद्यार्थ्यांवरील अन्याय  कदापि सहन करणार नाही. यूजीसीच्या नियमानुसाच   युपीएससी, एमपीएससी च्या जागा भरावेत अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल
सागर सोनकांबळे ( डीएपीएसए विद्यार्थी नेते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button