कर्नाटकमध्ये महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर

बंगळुरू -कर्नाटक राज्यात मे २०२६ मध्ये होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात येणार आहेत. तेथी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. बेंगळुरु प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका २५ मे नंतर होणार आहेत. त्यामध्ये मतदानासाठी मतपेट्या आणि बॅलेटपेपर ही ही जुनी पद्धत वापरण्यात येणार आहे, असे बंगळुरुचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संगरेशी यांनी सांगतिले. एवढेच नाही तर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही बॅलेट पेपरवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार य़ांनी दिली आहे. तर भाजपने या निर्णयावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरु झाली. मात्र, आता काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी बॅलेट पेपरटचा निणर्य घेण्यात आला, अशी टीका भाजपने केली.



