राजकीय

राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी सचिनदादानां ५० हजार मताच्या लीडने निवडून द्या – आमदार पंकजा मुंडे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, कृषीपंपाचे वीज बिल 100% माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. तसेच महिला, विद्यार्थी, शेतकरी, तरुण, कामगार, नवोद्योजक अशा समाजातील सर्व घटकांसाठी नवनवीन आणि उपयोगी योजना आणल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होत आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्यासाठी “सचिनदादांना ५० हजार मतांच्या लीडने निवडून द्या”, असे आवाहन भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी मैंदर्गी ( ता. अक्कलकोट ) येथील जाहीर सभेत केले.अक्कलकोट विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित मैंदर्गी येथील श्री शिवचलेश्वर मंदिरासमोरील पटांगणात जाहीर सभेत मुंढे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ.
जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, शहाजी पवार, मिलन कल्याणशेट्टी मोतीराम राठोड, दिलीप सिद्धे, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, शिवशरण जोजन, सुरेखा होळीकट्टी, दीप्ती केसुर, शिवशरण भरमा, मल्लिनाथ स्वामी, अविनाश मडीखांबे, अप्पू परमशेट्टी, सिद्धाराम बाके, सुरेश नागर, संजय मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मुंडे म्हणाल्या, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणलेले आहेत. पुढील काळात अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. यामुळे व्यवसाय वृद्धी होईल, पर्यटक संख्या पर्यटन वाढेल यामुळे रोजगार निर्मिती होईल. हे सर्व साध्य होण्यासाठी पुनश्च आम दार सचिन कल्याणशेट्टी यांना ५० हजारापेक्षा
अधिक मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. भाजपा तालुका महिला अध्यक्ष सुरेखा होळीकट्टी यांनी महायुती शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती दिली. याप्रसंगी सभेस किरण केसूर अनिल पाटील, योगीराज बाजारमठ, सिद्धाराम जकापुरे, लक्ष्मीपुत्र निंबाळ, देवराज जकापुरे, सिद्धाराम झंगी, नागेश सीदगी, मल्लिनाथ सलगर गौरीशंकर हिप्परगी, लक्ष्मण बुरुड शिवराज स्वामी, लोकापुरे, बिडवे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button