राजकीय

अक्कलकोटची विधानसभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लढवणार -दत्ता कांबळे

अक्कलकोट, (प्रतिनिधी )
नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवारी थांबविण्याची तयारी जवळपास निश्चित केली असून अक्कलकोट विधानसभेची निवडणुक रवि गायकवाड व दत्ता कांबळे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी पत्रकाराशी बोलताना दिली आहे.
       डॉ.राजरत्न आंबेडकर हे एक अत्यंत अभ्यासू, वैचारिक व आर्थिक सामाजिक आणि न्यायावर आधारित कार्यावर कार्यकरत असून भारतीय बौद्ध महासभा या संघटनेच्या वतीने व या संघटनेच्या माध्यमातून हजारो बुद्ध विहार विहाराची निर्मिती केली आहे.देश विदेशात जाऊन आपल्या भारतीय देशाची व्यथा मांडून बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व भिकू संघाची कतले,बौद्ध धर्माची अपप्रचाराची मनुवादयानी चालवलेली षडयंत्र अशाप्रकारे अनेक समस्यावर निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कार्यकरत आहेत. डॉ.राजरत्न आंबेडकर यांना येणारा काळ हा महाभयंकर असल्याची खात्री पटल्याने राजकीय क्षेत्र उतरला आहे.
     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून अक्कलकोट विधानसभेची निवडणूक लढण्याची जवळपास तय झाली असुन रवी गायकवाड व दत्ता कांबळे यांच्यापैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे.रवी गायकवाड हे आरपीआयचे पाश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष म्हणून त्याची निवड केली आहे.ते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांची सेवा व अन्याय त्याच्यावर वाचा फोडण्याचे काम केले आहे.तसेच मानव सेवा फाउंडेशन या संघटनेच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा,मोफत गॅस वाटप व संजय गांधी निराधार योजनेचे अशा अनेक कामे केलो आहे.असे आरपीआयचे तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे  म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button