महाराष्ट्र

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष शेळके स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

 .

 परंडा ( फारूक शेख ) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी आशिष अरुण शेळके यांना सहारा चारिटेबल ट्रस्ट या नीती आयोग एम सी ए एम एम एस ईजीएसी अमेरिकन मेरिट कौन्सिल याशी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय संस्थेने स्वामी विवेकानंद सेवारत्न पुरस्कार 2024 हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .
आशिष शेळके यांनी गेल्या चार वर्षांमध्ये शाखाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले असुन शासनाच्या विविध अनुदान प्रक्रियेमध्ये भरीव कार्य केले आहे .अनेक खातेदारांबरोबर प्रामाणिकपणे व्यवहार करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना चांगली वागणूक देऊन खातेदाराचे समाधान करत आहेत . शासनाच्यासात साडेसात कोटी रुपयांच्या मर्यादा असलेल्या योजनांमध्ये आणखीन भर टाकून 11 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेच्या योजनेचे वाटप त्यांनी केले आहे . त्यांनी बँकेच्या इतर साधनसामग्री मध्ये अमुलाग्र बदल केला असून ते एक बँकेचे आदर्श शाखाधिकारी म्हणून गणले जात आहेत . त्यामुळे त्यांचा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर ,फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के आणि जिल्हा सहसचिव मोहन  बनसोडे यांच्या हस्ते आशिष शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परांडा तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे युवा अध्यक्ष राहुल पवार यांच्यासह परंडा शहर तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी अशीश शेळके यांचे अभिनंदन करत पुढील उल्लेखनीय कार्य करण्यासाठी बँकेची ओळख करत एक आदर्श शाखाधिकारी म्हणून असेच काम पुढे करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button