महाराष्ट्र

विमा कंपनीने तक्रारीसाठी ऑनलाइन ॲप सुरू करावी अन्यथा ऑफलाईन तक्रारी घ्याव्यात.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) दि. २४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात नित्रुड, दिंद्रुडसह इतर काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानीबाबत सरसकट २५% अग्रीम देणे आवश्यक असताना विमा कंपनी व सरकारने याबाबत अद्याप निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी व विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे तक्रारी करण्यासाठी ऑनलाईन ॲप बंद असून, सरोवर डाऊन असल्याचे कारण समोर येत आहे अशावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत तक्रार दाखल करणे बंधनकारक असल्यामुळे विमा कंपनीसह कृषी विभागाने सदरील ॲप चालू करून शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यासाठी पर्याय खुला करावा किंवा सरोवर डाऊन असल्याकारणाने जर शेतकऱ्याला ऑनलाइन तक्रार दाखल करता आली नाही तर त्यांच्यासाठी ऑफलाइन तक्रारी घेण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या नुकसानीस कृषी विभागासह विमा कंपनीला जबाबदार धरून कृषी कार्यालयासह विमा कंपनीच्या कार्यालयांना ताळे ठोकण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी नित्रुड महसूल मंडळातील अतिवृष्टी झालेल्या गावांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिंदेवाडी येथे दिला, तसेच शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी होऊ घातलेल्या ३० ऑगस्ट रोजी च्या पात्रुड येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले त्यावेळी त्यांच्या समवेत प्रा. बालासाहेब येवले, नितीन येवले, फजलुभाई यांच्यासह शिंदेवाडी येथील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button