महाराष्ट्र

सोयाबिन,कापसाचे सरसकट अनुदान द्या…भाई ॲड.नारायण गोले पाटील

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) शेतकऱ्यांच्या शेतमालाला कीफायत शिर हमी भावाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असताना त्यावर सकारात्मक पणे शासनाने अद्यापही विचार केलेला नसून हमी भावाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक करून तुटपूंजा भाव शेतमालाला दिला जात असून याबाबत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊ नये यासाठी शासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम नेहमीच करत असते, त्याच धर्तीवर
शासनाने गतवर्षीच्या सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असून यासाठी ई पीक पाहणी ची यादी ग्राह्य धरण्यात येईल असे सांगितले असून अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करूनही त्यांचे नावे सदरील यादीत आलेली नसून लाखो शेतकरी निरक्षर असल्याने त्यांना ई पीक पाहणी करणे शक्य नाही ही बाब शासनाने विचारात घेऊन तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार माजलगाव यांना निवेदनाद्वारे केली असून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्यासह माजलगाव तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ , सहचिटणीस भाई राहुल सोळंके, भाई सतीश शेजुळ, खजिनदार भाई विष्णू शेळके , पुरोगामी युवक संघटनेचे चिटणीस भाई आनंत चव्हाण, पुरोगामी युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष भाई अशोक कुलकर्णी, भाई चांगदेव शेजुळ,भाई साळुजी हांडे ,भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, शिवाजी भाऊ शेजुळ यांच्यासह आदींनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button