सामाजिक

अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले !

 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट नगर परिषदेकडून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .
अक्कलकोट शहरास नगरपरिषदेकडून सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण दहा दिवस झाले तरी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर , फत्तेसिंह चौक , कुंभार गल्ली , नाईकवाडी गल्ली ,बेडर गल्ली , टिळक गल्ली , देशमुख गल्ली , भारत गल्ली सह विविध भागात पाणी सोडण्यात आले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अक्कलकोट नगर परिषदेकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची गरजेचे असताना दहा-अकरा दिवसाआडही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे .नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास याबाबत विचारणा केली असता शहरातील रस्ते विकासामुळे पाणीपुरवठ्याची पाईप लाईन खराब झाली आहे असे उत्तर मिळत आहे .नगरपरिषदेच्या प्रशासनाने पाणीपुरवठ्या संदर्भात नियोजन करणे महत्त्वाचे आहे. विकास कामे करताना नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून अक्कलकोट नगर परिषद प्रशासनाने शहरास तीन – चार दिवसात पाणीपुरवठा करण्यात कोणतीच अडचण नाही. अक्कलकोट शहराला जर दहा-बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असेल तर एवढी साठवण क्षमता ही सर्वसामान्य नागरिकांकडे नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे .अक्कलकोट नगर परिषद प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button