महाराष्ट्र
राज्यभरात पुढील 8 दिवस मुसळधार, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जरी!

पुणे -गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालं आहे. आता पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती राज्यात राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दहा ते बारा दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला आहे?
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट –
चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.