देश - विदेश

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा – खासदार प्रणिती शिंदे

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक होत रेशन कार्ड धारकांना ऑफलाईन धान्य द्यावे, तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्ड धारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे
खा. प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी

नवी दिल्ली -केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टा पेक्षा कमी मिळत आहे हे महाराष्ट्र व सोलापूर सह इतर जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांवर अन्याय आहे. म्हणून महाराष्ट्राला धान्याचा कोटा वाढवून मिळावे. त्याचप्रमाणे शेतकरी, बिडी कामगार, कष्टकरी कामगार कामामुळे त्यांच्या हातातील रेषा मिटतात त्यांचे बायोमेट्रिक होत नसल्यामुळे रेशन दुकानातून धान्य मिळत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन धान्य देण्यात यावा. तसेच अनेक रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. त्या सर्वांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे.
अशी मागणी सोलापूर लोकसभेचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button