संगठन सृजन अभियान’ यातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आ.रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

तिरुअनंतपुरम (केरळ) -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तसेच, केरळ राज्याचे विद्यमान गृहमंत्री मा.रमेश चेन्निथला यांची तिरुअनंतपुरम येथील केरळ विधीमंडळाच्या कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा, माजी मनपा परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात ‘संगठन सृजन अभियान’ राबविताना झालेली अनागोंदी, नियोजनातील त्रुटी व, कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी तसेच; पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबतचे सविस्तर विश्लेषण करून त्यांनी निवेदन सादर केले.
*त्यांच्या सदर भेटीदरम्यान खालीलप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अशा मागण्या मांडण्यात आल्या:*
१). आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व, प्रतिनिधी मंडळाच्या भावना तसेच; सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विषयांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) काँग्रेस कार्य समिती (CWC) यांच्या आगामी बैठकीमध्ये विचार करण्यात यावा.
२). भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार आणि, सध्याच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संघटनात्मक प्रश्नांबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महासचिव तथा खासदार प्रियांका गांधी-वाड्रा आणि, पक्षातील इतर अनुभवी तथा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष चर्चा करून भेटण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा.
३). सध्याच्या निवड प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या नैतिक, संघटनात्मक आणि, लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भातील प्रश्नांचा विचार करून सदर प्रक्रिया स्थगित अथवा; बरखास्त करण्यात यावी. तसेच, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत स्वतंत्र व, निष्पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद २२, २३ व, २४ अनुसार – पारदर्शक, लोकशाही व्यवस्थेवर आणि, नैतिक अधिष्ठानावर आधारित सर्वच जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी.
तसेच, संगठन सृजन अभियानासाठी सोलापूर जिल्ह्याला नेमलेले ओडिशा प्रदेश काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष तथा माजी आमदार देबाशिष पटनायक ह्या निरीक्षकांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशीही मागणी इथे करण्यात आली.
मा.रमेश चेन्निथला यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य स्तरावर याबाबत विचार करण्यात येईल असे त्यांना आश्वासन दिले आहे. तसेच, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्पष्टीकरणही मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
लोकहित आणि, काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले हे विविध प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील असा विश्वास मा.रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला आहे.



