महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण वन्दे मातरमचे स्वर

 

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी ६ कडव्यांचे आणि ३ मिनिटे १० सेकंदांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. ‘वन्दे मातरम्’ गीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हटले गेले. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही प्रथम ‘वन्दे मातरम्’, त्यानंतर ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.

‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाने सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. यासह ‘जन-गण-मन’ पूर्वी ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणण्याचा नवीन नियम लागू केला आहे, तसेच ‘वन्दे मातरम्’ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रथमच या नियमाची कार्यवाही झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button