सोलापूर

आपतग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये शासनाने नुकसान भरपाई द्यावी भीमशक्ती ची मागणी

सोलापूर ( रमेश सुरवसे )गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांची कंबरडे मोडली असून शेतकरी पूर्णपणे बरबाद. झाला आहे या पावसाने फळबाग उन्हाळी शेती व पिके याचे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतातील उभे पिक व माती सुद्धा वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले असून ते नुकसान भरून काढणे अशक्य असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई. मिळावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख नायब तहसीलदार सो स्मिता गायकवाड यांना देण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजेभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते पश्चिम महाराष्ट्र संघटक मेजर साबळे गायकवाड. वरिष्ठ पदाधिकारी के एम कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष  प्रमिलाताई तूपलवंडे शहराध्यक्ष ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button