सोलापूर

करमाळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न

करमाळा / सोलापूर  ( आयुब शेख ) करमाळा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाची मिटींग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष  अर्जुनराव गाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . सदर मिटींग ता अध्यक्ष अमोल कदम यांचा अध्यक्षतेखाली पार पड़ली. या वेळी सोलापूर येथे काल झालेल्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी भारत जिंदाबाद रॅलीला करमाळा तालुक्याला आमंत्रित केल्यामुळे सोलापूर जिल्हा कमिटीचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी अर्जुनराव गाडे यानी आपल्या भाषणात.मित्र पक्षाने आम्हाला विश्वासात न घेतल्यास जिल्हापरिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका आर पीआय (आठवले ) स्वबळावर लढवणार तसेच शासनाच्या नवीन आलेल्या योजना वंचिताना मिळाल्या पाहीजे या साठी कार्यकर्त्याने कामाला लागावे असे सांगीतले. या वेळी बाळासाहेब टकले आरपीआय धनगर आघाडीचे जिल्ह्याचे नेते अमोल कदम ता अध्यक्ष सुरेश धेंडे दत्तात्रय बनसोडे यांची भाषणे झाली. शेवटी आभार राजेंद्र सरतापे ता कार्याध्यक्ष रिपाई यानी आभार मानले. या वेळी रघुनाथ थोरात , विलास खरात , भैया कदम ,बबन सले , मनोहर शिंदे , पोपट कदम , भागवत गायकवाड ,राजू कांबळे , गोतम देडगे , महादेव सरतापे श्रावण कदम प्रकाश खरात आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button