सामाजिक

सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे , श्री सिध्देश्वर फाउंडेशनची मागणी

 

सोलापूर ( प्रतिनिधी )सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अल्लम प्रभू मंदिराजवळ तलावात गटारीचे पाणी सोडले जाते. अत्यंत निंदनीय गोष्ट आहे.  हे पाणी तलावात सोडणे त्वरित बंद करावे.सिद्धेश्वर तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी श्री सिध्देश्वर फाउंडेशन तर्फे करण्यात आली.
बाराव्या शतकातील सोन्नलगी गावातील लोकांना पाण्याची खूप अडचण होती. पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्यांना दूरवर जावे लागायचे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी हा तलाव स्वतःसह सुमारे चार हजार भक्तांना घेऊन खोदला आहे. या तलावात अडुसष्ठ तीर्थांचे जल आणून गंगापूजन केले आहे. त्यांच्या पुराणात या तलावाच्या संबंधी अनेक प्रसंग आलेले आहेत. या तलावातील पाण्यात स्नान करून अनेकांचे अनेक आजार संपलेले आहेत. असा उल्लेख या ग्रंथात आहे.
पहिली वॉटर बँक असे या तलावाला मानले जाते. हा तलाव म्हणजे सोलापूरचे भूषण आहे. सोलापुरातील भक्तांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. सकल तीर्थांची गंगा या तलावात आहे. इथे पवित्र स्नान करण्यासाठी नियोजन करावे. त्याचे पावित्र्य जपणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.  तलावात सोडले जाणारे गटारीचे पाणी त्वरित थांबवावे अशी मागणी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देऊन करण्यात आली. याप्रसंगी  अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे, राजेंद्र बलसुरे, यशवंत हिरापुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button