राजकीय

भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे :- प्रणिती शिंदे

 

शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक मोर्चा

सोलापूर ( प्रतिनिधी )शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी, विविध मागण्यासाठी,
महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरवर भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला होता. हजारो शेतकरी, नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सामील झाले होते.

यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापुर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र त्या अश्वसनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटकुटीला आला आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव मिळत नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार ?, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळाली नाही याचा जाहीर निषेध, शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत केलेल्या 10 पट केलेली वाढ कमी करावी शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा दया, शेती अवजारे, खत व औषधे यावरील GST रदद् करा, 7.5 HP विज बिल माफ केले. 8 / 9 HP पुढील विज बील माफ करावे, PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतीसाठी कॅनल मधून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फलबाग यांचा पिक विमा विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मिळत नाही ते मिळावे, ज्या त्या भागात जे पिक घेतलं जातं त्याचा समावेश पिक विम्यात करण्यात यावा, प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जोवर घरकुल बांधण्याची परवानगी दयावी, ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक गावात ग्रामसेवक / कोतवाल यांची नियुक्ती करावी, गावास स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून दयावा, गावाला व शेतकऱ्यांना मागणीनुसार MSEB DP देण्यात यावा, नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूणवेळ दयावा, जल-जीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावा, दुधाला 40 रु दर मिळावा व दूध अनुदान शेतक-याच्या थेट खात्यामध्ये देण्यात यावे, सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे, गाव दत्तक घेतलेल्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही, शेतक-यांच्या वर्ग 2 जमीनी वर्ग 1 करण्यात यावेत, सर्व रस्ते plan मध्ये घ्यावे. Plan – Non Plan असा भेदभाव करू नये, DCC बँकेने शेतकऱ्यांना पूर्वप्रमाणे कर्ज पुरवठा करावा, मंगळवेढा तालुका २४ गाव उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करावी, मोहोळ तहसील कार्यालय हे तेथील जनतेच्या इच्छेप्रमाणे व्हावे, मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजास आरक्षण दयावे. त्याचप्रमाणे अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर येथील शेतीसाठी पाण्याचे नियोजन, असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण शासन लक्ष देत नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करणारे सरकार आहे. महायुती सरकार मायबाप सरकार नसून उलट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे. असे म्हणत मी प्रत्येक क्षणाला शेतकऱ्यांसोबत आहे आपल्या लढायचे आहे आणि जिंकायचे आहे सगळ्यांनी मोर्चाला साथ दिली हीच एक निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी मायबाप साठी टिकू या तुम्ही मला सेवेची संधी दिली शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहीन

या मोर्चामध्ये माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दिलीपराव माने, कॉ नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सिध्देश्वर कारखान्याचे मा. चेअरमन धर्मराज काडादी, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे, शिवसेना जिल्हा अजय दासरी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते ,हजारो शेतकरी, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक बंधुभगिनी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button