टॉप न्यूज
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांत नाराजी

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय झालेले भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भाजपा पदाधिकारी तसेच समर्थकात नाराजी पसरली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा आशेवर समर्थक होते. पण आमदार कल्याणशेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने समर्थकांचा हिरमोड झाला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४९ हजार ५७२ इतक्या मताधिक्याने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विजय झाले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विजयामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मंत्री होण्याची चर्चा जोरदार रंगली होती. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आमदार सचिन कल्याणशेट्टी हे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे सहकारी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी असल्याने त्यांचा समावेश राज्याच्या मंत्रिमंडळात होईल अशी अपेक्षा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातून व्यक्त केले जात होते.राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. पण दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा समावेश न झाल्याने त्यांच्या समर्थकांतून व भाजपा कार्यकर्त्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपाने युवा नेतृत्वास जर संधी मिळाली असती तर सोलापूर जिल्ह्याच्या विकासास गती मिळाली असती अशा भावना समर्थकांत व्यक्त केल्या जात आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून आल्यानंतर मतदार संघात भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने आमदार समर्थक व कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे.