सामाजिक

स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरि किर्तन व रक्तदान शिबिर संपन्न

पुण्यवान व्यक्तीमुळे त्यांच्या वंशातील लोकांना मोक्ष मिळतो : – ह. भ. प. कबीर महाराज अत्तार

 

करमाळा ( आयुब शेख ) – जगात असा पिता असावा, ज्याच्यामुळे त्यांच्या वंशातील लोकांना मोक्ष मिळावा, म्हणजेच जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका व्हावी. कै. सुभाषआण्णांनी तहहयात लोकसेवेच्या माध्यमातून कमावलेले पुण्य आणि कुटुंबावर केलेल्या संस्कारांमुळे कुटुंबासह सर्वांनाच भक्ती मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत असून कै. आण्णांमुळे पुढील पिढीलाही मोक्ष मिळतच राहणार, असे गौरवोद्गार ह.भ.प. कबीर अत्तार महाराज यांनी केले. कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ह.भ.प. कबीर महाराजांनी सांगितले की, कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी, गोरगरीब वर्गासाठी संघर्ष रुपी साधना केली. सर्व सामान्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या नंतरही कष्टकरी वर्गाच्या सेवेचा हा वारसा ॲड. राहुल सावंत व सावंत कुटुंबीयांकडून पुढे चालू राहीला आहे, हाच खरा मोक्ष मार्ग असल्याचे
प्रतिपादन केले.
स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात सावंत गल्ली येथील मारुती मंदिरासमोर कीर्तन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ .गजानन गुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड. नवनाथ राखुंडे, सरपंच धनंजय शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या शिबिरात १७४ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात आला. श्री कमलाभवानी ब्लड बँकेने या शिबिरात रक्त संकलनाचे काम केले. ह.भ.प. कबीर महाराज यांच्या कीर्तनानंतर शहर व तालुक्यातील मान्यवरांनी स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला आमदार श्री. नारायण आबा पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, स.पो.नि. रोहित शिंदे, डॉ. वसंतराव पुंडे, प्रा. रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखरतात्या गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, सूर्यकांत पाटील, प्रभाकर शिंदे, किसन आण्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, पाराजी शिंदे, सावळा झिंजाडे, एकनाथ झिंजाडे, गोविंद किरवे, विलास मुळे, संदिप शेळके, गोवर्धन करगळ, केशव केकाण, नानासाहेब जाधव, बाळासाहेब अडसूळ, निवृत्ती सुरवसे, चंद्रकांत काळे, विजय थोरात, पांडुरंग भांडवलकर, गणेश अंधारे, उमेश बागल, आनंद बागल, जयद्रथ शिंदे, नितीन घोलप, महादेव फंड, राजू आव्हाड, प्रकाश झिंजाडे, देविदास वाघ, सरपंच मोरे भाऊसाहेब, बिभीषण आवटे, नागेश ढेरे, डॉ. दिपक केवारे, डॉ. विशाल शेटे, अॅड. डॉ. बाबूराव हिरडे, अॅड. कमलाकर वीर, अॅड. अलिम पठाण, अॅड. अजित विघ्ने, अॅड. एम. डी. कांबळे, अॅड. इंगळे, अॅड. नानासाहेब शिंदे, अॅड. प्रमोद जाधव, अॅड. बलवंत राऊत, शिवाजी बंडगर, उपाध्यक्ष संचालक दत्तात्रय देशमुख, राजाभाऊ कदम, हजारे, रवींद्र फुके, उमेश सरडे, आबा अंबारे, रामेश्वर तळेकर, कार्यकारी संचालक अरुण बागनवर,रवींद्र फुके, उमेश सरडे, आबा अंबारे, रामेश्वर तळेकर, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, बाळासाहेब गायकवाड, शिवशंकर जगदाळे, महादेव गायकवाड,जनार्दन नलवडे, शहाजी शिंगटे, किरण पाटील, ॲड. सुनिल रोकडे, पप्पू शिंदे, ॲड. प्रशांत बागल, ॲड. सुहास मोरे, ॲड. नानासाहेब घोलप, जयंत दळवी, सचिन जव्हेरी, दिनेश मडके, विशाल परदेशी, अशोक मुरूमकर, अलिम शेख, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसूळ, विलास बरडे, प्रताप बरडे, गौतम ढाणे, तात्या पाटील, भाऊसाहेब काळे, बबन नरसाळे, भागवत वाघमोडे, सुरेश भोगल, विलास जाधव, आण्णा पाटील, चित्तरंजन पाटील, विलास नलवडे, नंदू घाडगे, मोहन पडवळे, शशिकांत केकाण, मानसिंग खंडागळे, दौलत वाघमोडे, प्रविण मुरूमकर, माधव नलवडे, नामदेव शेगडे, रावसाहेब शिंदे, अध्यक्ष विजय दोशी, मिलिंद दोशी, परेश दोशी, मनोज पितळे, विकी मंडलेचा, उत्कर्ष गांधी, प्रदिप लुणिया, विलास दळवी, नानासाहेब मोरे, राजेंद्र घाडगे, मनोज गोडसे, मनोज राखुंडे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नगरसेवक संजय सावंत, सुनिल बापू सावंत, डॉ. संकेत सावंत, पै. गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाढवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, शरद वाडेकर, गोविंद सुरवसे, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, संदिप पडवळे, संदिप दुधाळ, नामदेव शिंदे, गजानन गावडे, दादा सुरवसे, पप्पू रंदवे, सागर वीर, शुभम कोंगे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button