राजकीय

लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

अक्कलकोट ( प्रतिनिधी )लाडके बहीण योजना बंद होणार नाही – राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना द्वारे त्यांना मदत करत आहेत राज्य सरकार ही लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावर पैसे दिले आहेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील 94 हजार बहिणींना ज्या योजनेतून पैसे देण्यात आले आहेत ही योजना बंद करण्याचा काँग्रेस नेत्यांचा डाव असून मुंबईत बसलेले सख्खे भाऊ ही योजना बंद होऊ देणार नाही सावत्र भाऊ हे योजना बंद करण्याची भाषा करत आहेत हा डाव आम्ही हाणून पाडू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अक्कलकोट येथे मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उजनीच्या पाण्याचे जलपूजन  व विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. राजे फत्तेसिंह मैदानावर सकाळी ११ वाजता जाहीर सभा संपन्न झाली. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, व्हसमनी महाराज, शहाजी पवार, अण्णाराव बाराचारी रामाप्पा चिवडशेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे ,शिवानंद पाटील , युवा नेते मिलन कल्याणशेट्टी, अविनाश महागावकर ,राजकुमार कापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी उजनीच्या पाण्याचे जलपूजन व विविध विकास कामाचें भूमिपूजन संपन्न झाले. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. पण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ही योजना देता येणार नाही असे सांगत शेतकऱ्यांची चेष्टा केली होती. आमचे सरकार आता शेतकऱ्यांना मोफत वीज देत असून शून्य बिल आले आहे. राज्यात १२ हजार मेगावॅटची सौर ऊर्जा निर्मिती होत असून शेतकरी बांधवांना आता दिवसा वीज देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९०% अनुदान राज्य सरकार देत आहे. यामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत नमो किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात असून शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे याचे नियोजन राज्य सरकार करत असल्याचे सांगितले.अक्कलकोट तालुका सिमावर्ती  तालुका म्हणून नेहमीच अन्याय करण्यात आला आहे. शेवटचा तालुका म्हणून पाणी दिले नाही, विकास कामाला निधी मिळाला नाही. पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा केल्याने गेल्या २७ वर्षापासून बंद असलेल्या एकरूख सिंचन योजनेसाठी ४१२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच देगाव सिंचन योजनेसाठी ३५० कोटी रुपये दिले आहेत. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीतील भूमिगत गटारींसाठी १६७ कोटी रुपये , अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासासाठी १०२ कोटी रुपये, अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ७५ कोटी रुपये मैंदर्गी दुधनी शहराच्या   पाणीपुरवठा योजनेस निधी, दुय्यम निबंध कार्यालय ,दक्षिण उत्तर पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी निधी देण्यात आला असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला आहे. उजनीचे पाणी देण्यात आले असून विविध मंदिरांचा जिर्णोद्धार केला जात आहे. आपले सरकार हे काम करणारे व विकास करणारे आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, लोकसेवक म्हणून ज्या ज्या मागण्या केल्या त्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले आहेत. एकरूख योजनेसाठी सुप्रमा दिली असून या योजनेमुळे १७ हजार  हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरभरून निधी मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यासाठी पाणी हे मृगजळ ठरले होते. या योजनेसाठी राज्य सरकारने ३५० कोटी रुपये निधी दिल्यामुळे ७५ वर्षानंतर स्वप्न पूर्ण होत आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध केल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे खरे भगीरथ ठरले आहेत. तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ५२० किलोमीटर रस्ते अडीच वर्षात तयार झाले आहेत. दवाखाने, रस्ते यांच्या सुविधा ह्या केवळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच पूर्ण झाले आहेत. तसेच अक्कलकोटचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी ७५ कोटींचा निधी भूमिगत गटारीसाठी १६७  कोटी रुपये तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी भरीव निधी  न्यायालय बांधण्यास  निधी , बस स्थानक निर्मितीसाठी निधी, श्री मल्लिकार्जुन मंदिरासाठी निधी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून निधी दिला आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदैव कृपा राहिली आहे. यामुळेच आज त्यांच्या हस्ते उजनीच्या पाण्याचे जलपूजन होत आहे असे यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी  सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
 
चौकट – आमदार कल्याणशेट्टी विकासाचा हिरा – उपमुख्यमंत्री – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विकास कामे करून अक्कलकोटचा कायापालट केला असून ते विकासाचा हिरा आहेत. आमदार असावा तर कल्याणशेट्टी यांचा सारखा असावा .
यावेळी सुरेखा होळीकट्टी, परमेश्वर यादवाड, संजय देशमुख ,अविनाश मडीखांबे, अण्णाराव बाराचारी आदींनी मार्गदर्शन केले.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सभेस भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड ,शहराध्यक्ष शिवशरण जोजन , विलास गव्हाणे, महेश हिंडोळे,  अंकुश चौगुले, ननू कोरबू, यशवंत धोंगडे, महेश जानकर, प्रवीण शहा रामाप्पा चिवडशेट्टी, बाळा शिंदे प्रभाकर मजगे मल्लिनाथ स्वामी अविनाश कल्याणशेट्टी  चंद्रकांत दसले धनंजय गाढवे राजकुमार झिंगाडे, शिवशरण वाले अशोक येणगुरे मल्लिकार्जुन मसुती विलास कोरे अमर पाटील संजीवकुमार पाटील, रजाक सय्यद, शिवू स्वामी  आदींसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button