सामाजिक

करमाळा येथे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांना सकल मराठा समाजाचे निवेदन

 

करमाळा ( आयुब शेख )मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या  पुर्ण करुन घेणेबाबात. राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांना सकल मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आले. अंतरवली सराटी येथे मराठा संघर्षयोध्दा . मनोज जरांगे पाटील हे ८ दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले आहेत, शासन स्तरावर अजून सुध्दा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही. याचा आम्ही सकल मराठा समाज करमाळाच्या वतीने जाहिर निषेध करतो.
मराठा संर्घष योध्दा . मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या शासना समोर मांडल्या आहेत त्या मागण्या ताक्ताळ दादा आपण पुर्ण करून घ्याव्यात, दादा आपण मराठा समाजाचे केंद्र बिंदु आहात. महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. दादा तुम्ही मराठा असल्याची जाणीव ठेवून तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून ५०% च्या आतून आरक्षण मिळवून द्यावे , महाराष्ट्रामध्ये सध्या ओ.बी.सी.चे दाखले मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत परंतू त्या दाखल्याचा जात पडताळणी ऑफिसमध्ये पडताळणी करून मिळत नाही व लाखांवर पैसे मागण्याचे प्रकार चालू आहेत संबंधीत एजंट व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत म्हणजे पैसे मागण्यांचे थांबतील. आपली प्रशासनावर मजबूत पकड आहे संबंधित अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आपण नक्कीच कराल ही अपेक्षा, ज्या बांधवाच्या ओ.बी.सी. नोंदी सापडल्या नाहीत त्या बांधवांसाठी सगे सोयरेचा अध्यादेश ताक्ताळ दादा तुम्ही काढून घ्यावा.

दादा तुम्ही . मनोज जरांगे पाटील यांच्या जिवाची काळजी कराल हि अपेक्षा आणि श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या तात्काळ पुर्ण करून घ्याव्यात. जर असे झाले नाहितर मात्र तुम्हाला मराठा समाज कधीही माफ करणार नाही, मराठा समाज्याच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण करून उपोष थांबवावे हि अपेक्षा असे निवेदन उपमुख्य मंत्री अजित पवार यांना सकल मराठा समाज, शहर व तालुका करमाळा यांच्या तर्फे देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button