जीवितास हानी निर्माण करणाऱ्या एन एस एल शुगर्सवर गुन्हे दाखल करा – भाई ॲड.नारायण गोले पाटील

शेतकरी कामगार पक्षाचा तब्बल दीड तास रास्ता रोको..
माजलगाव ( नाजेर कुरेशी ) एन एस एल शुगर्स साखर कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या उसाच्या मळीचे व विषारी पाणी माजलगाव धरणाच्या पाटात सोडून दिल्यामुळे, मळीचे व विषारी पाणी पवारवाडी, खरातआडगाव, निपाणी टाकळी, रोशनपुरी, मोठीवाडी, छोटीवाडी, गंगामसला आदी गावच्या विहिरीत, बोअरवेल मध्ये व गुरांच्या सार्वजनिक पाण्याच्या खड्ड्यामध्ये उतरले असून त्या पाण्यामुळे मनुष्यासह पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून खरात आडगाव येथे गाई, म्हशी, शेळ्या यांच्या गर्भधारणा होत नसुन खरात आडगाव येथे अनेक कुत्रे पिसाळली आहेत व त्यांनी अनेक नागरिकांना चावा देखील घेतला आहे, याशिवाय अनेक शेतकऱ्यांची पिके या विषारी पाण्यामुळे जळून गेले असून अनेक नागरिक दवाखान्यांत हेलपाटे मारत आहेत, मनुष्यासह पशुच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एन एस एल शुगर्स कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना २०२४-२०२५ च्या ऊस गाळपाचा परवाना देऊ नये, तसेच गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे शेतकऱ्याचा संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावी तसेच २०२०,२०२३,२०२४ चा पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावा तसेच गतवर्षीच्या सोयाबीन कापसाचे अनुदान सरसकट देण्यात यावे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमीभाव देण्यात यावा,यासह मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात या मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली गंगामसला येथे २१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनाच्या तब्बल तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या या वेळी तहसील प्रशासनाने आंदोलकाचे निवेदन स्वीकारले तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,या आंदोलनासाठी भाई राहुल सोळंके, भाई मुंजा पांचाळ, भाई अशोक कुलकर्णी, वल्लभ सोळंके, गणेश सोनटक्के, सुनील सोळंके, उत्तम भाऊ सोळंके, दिपक नाना सोळंके, बबलू कूकडे, डिगंबर सोळंके,रवि सोळंके, अभिजीत सोळंके, दत्ता सोळंके, अक्षय सोळंके, पी जी सोळंके, शरद सोळंके,शाम सोळंके,अमोल सोळंके,अरूण सोळंके, शीवाजी सोळंके,
मनोहर चौधरी, विठ्ठल पंडीत
कैलाश सोळंके,कैलाश सोळंके, मावली धरपडे भाई राजेभाऊ शेरकर, भाई लक्ष्मण चव्हाण, भाई भास्कर कांबळे, रोहीत वाघमारे,पमा शेरकर, मोहन शिंदे, मुकेश शेरकर, सदा पवार,शिद्दीक शेख,भारत आढाव, मुंजाराम रसावे ,कौस्तुभ जोशी, चांगदेव शेजूळ ,गोविंद आढाव , सतीश शेजूळ , राजेभाऊ मव्हाळे , अशोक आढाव, सुभाष थोरात विजय राठोड आदींनी परिश्रम घेतले.