सोलापूर
आस्था रोटी बँकेतर्फे गणेशोत्सवनिमित्याने श्रीगणेश मुर्तीचे वाटप

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात
सोलापूर ( प्रतिनिधी )
आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे प्रत्येक जण घडयाळयाच्या काटयावर जीवन जगत आहे. तिथे अश्या सणासुदीनिमित्याने वेळ व लुप्त होत असलेल्या संस्कृती, पंरपरांना जोपसले पाहिजे येणाऱ्या पिढींमध्ये हे संस्काराचे मोती देण्यासाठी
आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात यंदाही गणेशोत्सवनिमित्याने 21 शाडुच्या गणेशमुर्तींचे वाटप सोलापूरातील अश्या संस्थांना दिले जाते जिथे समाजपयोगी कार्य करुन मुलांना ,विदयार्थींना ,वस्तीगृहात राहून उच्च शिक्षणाकरिता आलेल्या गरजू वस्तीगृह आश्रीत ,अनाथ आश्रम ,वृध्दाश्रम अश्या ठिकाणी दिले जातात.
या स्तुत्य उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे सोलापुर महानगरपालिकेच्या माजी महापौर .शोभा बनशेट्टी ,सिध्दरामेश्वरच्या जात्रेत अक्षता सोहळयात सर्वप्रथम मान मिळालेल्या राजशेखर हिरेहब्बू , सिध्दी डेव्हलर्पसचे संचालक रामचंद्र कबाडे,समाजसेवक राजु हौशेट्टी तसेच सोलापूरच्या न्यायधीश सचिव .निता मंकणी , .मिथुन शहा, BSNL चे वरिष्ठ अधिकारी .अमित कांबळी ,डाॕ.मीना गायकवाड ,.राजशेखर विजापुरे , कैलास जेऊरे आदींचा सहभाग होता. हया उपक्रमात सोलापूरच्या 21 सामाजिक संस्थांना गणेशमुर्तींच वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने मंगलदृष्टी वृध्दाश्रम ,
प्रार्थना फाऊंडेशन ,मातोश्री मागासवर्गिय मुलींचे वस्तीगृह मंद्रुप,महिला कुष्ठरोग वसाहत,हबीबा बालकाश्रम,क्रांती महिला संघ,शांताई अनाथ आश्रम,
संस्कार अनाथश्रम,बेघर निवारा,अंध आश्रम,
निवासी शाळा असे एकूण 21 संस्थेंना गणेश मूर्ती वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौरांनी आपले मनोगतात आस्थाच्या कार्याची स्तुती केलीय इतक्या तळागळात जाऊन काम करणे खुप कठीण असते तरीही तुमच्या सारख्या संस्थेतर्फे राबवण्यात येणारे असे उपक्रमामुळे येणाऱ्या नव्या पिढीला संस्कार देण्याचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
तदनंतर राजू हौशेट्टी यांनी उपक्रमासाठीचे नियोजनाविषयी मान्यवरांना माहिती दिली. या
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले.
प्रस्तावना निलिमा हिरेमठ तर आभार प्रर्दशन संपदा जोशी यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा .विजय छंचुरे ,सांगिता छंचुरे, निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,पुष्कर पुकाळे ,छाया गंगणे ,निता आक्रुडे,सुर्वणा पाटील,स्नेहा मेहता,मंगल पांढरे, अविनाश मार्चला आदींनी परिश्रम घेतले.