सामाजिक

रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांचे एम. एस. ई. बी च्या विरोधात अनोखे आंदोलन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- अक्कलकोट शहरातील विविध भागामध्ये सोमवारी रात्री 10:30 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत  देखील लाईट नसल्याने रिपाइंचे आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना शहरातील विवीध भागातील अनेक नागरिकांनी फोन करून एम एस ई बी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध वारंवार हेच तक्रार असल्याचे सांगितले. त्यावेळी तत्परता दाखवून अविनाश मडिखांबे यांनी त्वरीत विज मंडळ कार्यालयात पोहोचले, आणि तेथील कर्मचाऱ्यांना त्वरित शहरातील अनेक भागात लाईट दुरुस्ती करण्याची सुचना केली. जर लाईट आली नाही तर आजचा मुक्काम तुमच्या कार्यालयात होईल असे सांगून मडिखांबे यांनी मध्य रात्री 1.00 ते लाईट येईपर्यंत ते कार्यालयात अंथरून घेऊन झोपले. या अनोख्या आंदोलनाची अक्कलकोट शहरात चर्चा सुरू  आहे. गोर गरीबांच्या अनेक  संकट काळात सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button