राजकीय
अक्कलकोट विधानसभेसाठी मल्लिकार्जुन पाटील यांनी मागितली उमेदवारी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही तयारीला सुरुवात केली
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षानं 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.
यावेळी अक्कलकोट काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व मल्लिकार्जुन पाटील यांनी सुद्धा स्वतःसाठी अक्कलकोट विधानसभा क्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.
त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार
काँग्रेस पक्षाकडं आज शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे अर्ज सादर केला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून काल माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी देखील उमेदवारी आपणास मिळावी अशी मागणी केली आहे. .मल्लिकार्जुन पाटील हे काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम करून पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला वाढविण्याचे काम करीत आहेत.ते एक उमदे आणि तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यात पोचवीण्याचे काम सक्रियपणे करीत आहेत. त्यांना आजपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती,सिद्धेश्वर साखर कारखाना आणि अन्य ग्राम स्तरावर ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्याचे सोने केले आहे..येत्या काळात पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी अक्कलकोट विधानसभेतील उमेदवारीवर कोणत्या पद्धतीने विचारमंथन करून निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.उमेदवारी अर्ज मागणी करताना रामचंद्र अरवत,शिवाजीराव कलमदाणे,इरण्णा कणमुसे, रवी स्वामी, सुभाष पाटील, शिवराज बोरीकरजगी, अंबाराया कनोजी, सूर्यकांत चौधरी, बाळासाहेब पाटील, सुनील जाधव, परशुराम सातले, नितीन नन्नवरे,गणेश कदम,संगप्पा पाटील, सिद्धाराम बामणे, शिवपुत्र चौलगी, सिद्धाराम कापसे यांच्यासह 200 मतदार संघातील नागरिक उपस्थित होते.