परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे :- प्रा.डॉ. मिलिंद आवाड

माजलगाव ( नाजेर कुरेशी ) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतिचे आयोजन मानवी हक्क अभियान शाखा माजलगाव यांच्या वतीन वैष्णवी मंगल कार्यालय येथे जयंती सोहळा दि.१ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.
समाजाला जर दखलपात्र व्हायचे असेल तर समाजाने परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे तरच समाजाची उन्नती होईल व जयंती साजरा केल्याचा हेतू साध्य होऊन हीच महापुरुषांना आदरांजली ठरेल असे मत मानवी हक्क अभियान आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कार्यक्रमात जे.एन. यु .विद्यापीठाचे प्राध्यापक तथा मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद आवाड यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.डी. के. देशमुख प्रमुख पाहुणे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, नारायण डक, राम राठोड, अभय होके पाटील, दयानंद स्वामी, कचरू खळगे, नानासाहेब घोडके, शेख रशीद, मनोहर डाके, जयदत्त नरवडे, बबन सरवदे, जीवन राठोड, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होती
शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पाईक होऊन जो गोरगरीब ,दलित ,वंचित यांची लढाई लढणाऱ्या कर्मवीर एकनाथ रावजी आव्हाड यांना मातंग समाजाच्या मुलाने तहसीलदार, एस .पी, कलेक्टर असा विविध क्षेत्रात आपले नाव लौकीक करावी व या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे अशी स्वप्न बाळगून आयुष्यभर समाजाचे काम करणाऱ्या कर्मवीर एकनाथ आवड यांच्या संकल्पनेतला समाज घडवण्यासाठी आपण परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे तेव्हाच समाजाची प्रगती होईल व खऱ्या अर्थाने महापुरुषांनाच्या जयंतीचे मोल होईल असे मत प्रा. डॉ.मिलिंद आव्हाड व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी मानवी हक्क अभियानचे तालुकाध्यक्ष मधुकर कांबळे, बबन खंडागळे, प्रल्हाद दळवी, रमेश गवळी, रमेश जाधव, शरद लोखंडे, संजय वाघमारे, बाबासाहेब थोरात, कचरू कांबळे, अनिल राधे कांबळे, सुधाकर कांबळे, संदीप वाघमारे, शिवाजी सुतार, अनिकेत वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली यावेळी हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.
