सामाजिक
दुधनीत नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी )-नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्ष व लोकसेवकांचा सन्मान दुधनी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्यावतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनिप्र डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजी हे होते. तर व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश साठे, शिवसेना नेते शंकर म्हेत्रे,नगरसेवक अमोल शिंदे,दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे,उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार,
आनंद तानवडे,नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे,शिवराज म्हेत्रे,पंचायत समितीच्या सदस्या शितल म्हेत्रे,संगीता पाटील,वैशाली म्हेत्रे,गीता म्हेत्रे व तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.प्रारंभिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे, लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर वीरशैव माळी समाजाच्या वतीने नूतन लोकसेवकांचा सन्मान संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री करडे व हुळ्ळी यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी आगामी काळात दुधनीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले.उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक रामा गद्दी यांनी केले.तर आभार सुनील आळंद यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हेत्रे,उपाध्यक्ष श्रीमंत माळी,मल्लिनाथ कोटनूर,महेश चिंचोली,शिवानंद माड्याळ,महालिंग कोटनुर, चंद्रकांत म्हेत्रे,लक्ष्मीपुत्र कोटनूर, उमेश आळंद,शंकर हंगर्गी,सुरेश खैराट,शिवबा कनोजी,शरणाप्पा तोळणुर,शिवण्णा कोटनूर व शामराव गद्दी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट -याच कार्यक्रमात भाजप सोडुन शिंदेसेनेत आलेले आनंद तानवडे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.सध्या भाजपामध्ये निष्ठावंतांना न्याय मिळत नाही.ज्यांनी जनमानसात भाजपाचे विचार रुजवले अशा लोकांना सन्मानाची वागणुक मिळाली नाही याचा खेद वाटतो अशी भावना व्यक्त केली.
चौकट -याच कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी यापुर्वीचा काळ खडतर असल्याचे सांगितले परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या बळाने आज अक्कलकोट तालुक्यात धनुष्यबाण घरोघरी पोहोचल्याचे समाधान आहे.



