महाराष्ट्र

राज्यात थंडीचा कडाका; गारठा वाढला

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
राज्यासह देशात कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे गारठा वाढल्याने राज्यात शीत लहरी येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईची हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. धूळ, धुके आणि धुरामुळे श्वास कठीण झाले आहे. नरिमन पॉईंट परिसरात धूसर वातावरण आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात गुलाबी थंडी सुरू झाली. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळात झाली. धुळ्यात ६ अंश सेल्सिअस तापमान होते. धुळ्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. जेऊर आणि निफाडमध्ये पारा घसरला. ६ च्या आसपास तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडे थंडी वाढत असल्याने राज्यातही थंडी वाढली आहे. मालेगाव, आहिल्यानगर, गोदिया येथे ९ अंश सेल्सिअस तापमान होते. पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर आणि संभाजि नगर येथे १० अंश सेल्सिअस तापम हवेत तयार झालेल्या धुरक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे. वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button