सामाजिक

तब्बल 75 वर्षानंतर दुधनी येथील गांधीनगर सोळसे लमाण तांडा ग्रामपंचायतीस मिळाला न्याय ! तहसिल कार्यालयात प्रभाग आरक्षणाची सोडत

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

दुधनी येथील गांधीनगर सोळसे लमान तांडा ग्रामपंचायतच्या प्रभाग आरक्षणाची सोडत बुधवार दिनांक 31 जुलै रोजी तहसील कार्यालय अक्कलकोट येथे काढण्यात आली. तब्बल 75 वर्षानंतर प्रदिर्घ लढ्याला  यश आले असून गांधीनगर सोळसे लमान तांडा ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. यामुळे गांधीनगर ग्रामपंचायत मधील नागरिकांनी तहसील कार्यालय अक्कलकोट समोर आनंद व्यक्त केला. गांधीनगर सोळस लमाण तांडा ग्रामपंचायत मध्ये एकूण तीन प्रभागात नऊ वार्ड आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये एस सी स्त्री वार्ड क्रमांक दोन मध्ये ओबीसी स्त्री वार्ड तीन मध्ये जनरल स्त्री पुरुष प्रभाग दोन मध्ये वॉर्ड एक मध्ये एससी स्त्री वार्ड दोन मध्ये जनरल स्त्री वार्ड तीन मध्ये जनरल स्त्री पुरुष प्रभाग तीन मध्ये वार्ड एक मध्ये एससी पुरुष वार्ड दोन मध्ये ओबीसी पुरुष वार्ड तीन मध्ये जनरल स्त्री अशी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.तसेच  सरपंच पद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे .वार्ड रचनेमध्ये पाच जागा महिलांसाठी तर चार जागा पुरुषांसाठी आरक्षित असणार आहेत. या आरक्षण सोडत प्रसंगी ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव, शिवाजी राठोड ,माजी सभापती आनंदराव सोनकांबळे सुरेश राठोड सातलिंग निंबाळ बसवराज जन्ना बसपा नेते सैदप्पा झळके सुरेश झळकी गोपी राठोड धेनू जाधव विजय राठोड धर्मा राठोड लक्ष्मण राठोड संजय राठोड तिपू राठोड सचिन राठोड विकास चव्हाण नारायण राठोड पत्रकार विश्वनाथ राठोड आकाश चव्हाण गोपू राठोड प्रवीण राठोड आकाश बासू चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते जगन्नाथ जाधव यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्यामुळे गांधीनगर सोळसे लमान तांडा ग्रामपंचायतचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर शासनाकडून न्याय मिळाला असून गांधीनगर भीमनगर ग्रामीण आदी  भागातील विकास कामास यामुळे चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगितले या नवीन प्रभाग रचनेमुळे गांधीनगर ग्रामपंचायत मधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button